शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"संविधानातून समाजवादी,धर्मनिरपेक्ष शब्द हटवले"; काँग्रेसच्या आरोपावर सरकारचं स्पष्ट शब्दात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 16:51 IST

महत्वाचे म्हणजे, 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने हे दोन्ही शब्द राज्य घटनेत सामील केले होते...

संसदेच्या नव्या इमारतीत सध्या विशेष अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त संसदे प्रवेश करताना सर्व खासदारांना संविधानाच्या प्रती देण्यात आल्या. यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी संविधानाच्या नव्यान प्रतीतील प्रस्तावनेतून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द हटविण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच हे दोन्ही शब्द नसणे ही चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारचा हेतू संशयासंपद -सरकारवर आरोप करताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, जर काही बोलायचा प्रयत्न केला, तर सरकार म्हणेल, जे सुरुवातीला होते तेच देत आहोत. सरकारचा हेतू संशयास्पद आहे आणि मोठ्या हुशारीने सरकारने हे दोन्ही शब्द हटवले आहेत." महत्वाचे म्हणजे, 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने हे दोन्ही शब्द राज्य घटनेत सामील केले होते.

सरकारनं दिलं असं उत्तर - सरकारवर हल्ला चढवत काँग्रेस नेते आधीर रंजन चौधरी म्हणाले, सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यावर, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) म्हणले, यासंदर्भात आम्ही यापूर्वीच उत्तर दिले आहे. ते म्हणाले, प्रतींमध्ये राज्यघटनेच्या प्रास्तावनेची मूळ आवृत्ती होती आणि हे शब्द घटनादुरुस्तीनंतर यात जोडले गेले होते.

सुशील मोदींनीही दिलं स्पष्टीकरण -अधीर रंजन चौधरी यांच्या आरोपावर भाजप नेते सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले, अधीर रंजन चौधरी यांची माहिती कमी आहे. खासदारांना ही मूळ प्रत दिली आहे. यावर वाद का होत आहे. जेव्हा खासदारांना मूळ प्रत दिली जाईल तेव्हा त्यात दोन्ही शब्द असतील.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस