शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भाजपाला आणखी एका मित्राची साथ मिळणार; दक्षिणेत राजकीय समीकरण किती बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 10:33 IST

चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रमुख राजकीय पक्ष सत्तेची समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी आघाडी INDIA दोन्हीही आपापला विस्तार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीनं आता कर्नाटकावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. भाजपा दक्षिणेतील प्रवेशद्वारात पुन्हा शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्यूलर यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे. एका वृत्तानुसार, जेडीएस प्रमुख एचडी देवगौडा यांची आघाडीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी भेटही झाली आहे. जेडीएससोबत युतीवर प्राथमिक चर्चाही पार पडली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, देवगौडा आमच्या पंतप्रधानांना भेटले त्याचा आनंद आहे. जेडीएसकडून ५ जागा मागितल्या जात आहेत. त्यात जेडीएस मांड्या, हासन, तुमाकुरू, चिकबल्लापूर आणि बंगळुरू ग्रामीण या जागेसाठी जेडीएस आग्रही आहे.

चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मांड्या लोकसभा जागेवर २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी, तुमकुर जागेवरून स्वत: एचडी देवगौडा, हासन जागेवरून नातू प्रज्वल रेवन्ना हे उमेदवार होते. बंगळुरू ग्रामीण जागेवर २०१४ मध्ये निवडणुकीत एचडी कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी उमेदवार होत्या. या सर्व जागा वोक्कालिगा समुदायाची ताकद असलेले मतदारसंघ आहेत.

भाजपा-जेडीएस युतीने काय समीकरणं बदलणार?

भाजपा आणि जेडीएस जर एकत्र आले तर दक्षिण भारतातील या राज्यात सामाजिक आणि राजकीय समीकरण पूर्णत: बदलतील. कर्नाटकातील लोकसंख्येच्या १७ टक्के हिस्सा असलेला लिंगायत समाज भाजपाचा पारंपारिक मतदार मानला जातो. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लिंगायत समुदायातून येतात. तर लिंगायत समुदायानंतर १५ टक्के लोकसंख्या असलेला वोक्कालिगा समुदाय दुसरा प्रभावशाली समाज आहे. वोक्कालिगा समाज पारंपारिक जेडीएसचा मतदार मानला जातो.

त्यामुळे भाजपा-जेडीएस एकत्र आल्यास एनडीएच्या पारड्यात ३० टक्क्याहून अधिक मतदान होऊ शकते. परंतु आघाडीच्या स्थितीत या दोन्ही पक्षाच्या मतदारांची किती मते एकमेकांना पडतील हा वेगळा विषय आहे. परंतु सामाजिक आणि प्रादेशिक राजकीय समीकरणात एनडीएला ताकद मिळू शकते. आता प्रश्न असा आहे की, कर्नाटकात स्वबळावर सरकार चालवणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीपूर्वी जेडीएसची मदत का घ्यावी लागली? त्याचे उत्तर २०२३ च्या निकालात आहे. २०२३ च्या निकालात कर्नाटकात भाजपाला ३६.३ टक्के मते मिळून ६६ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला ४३.२ टक्के मते पडून १३५ जागा मिळाल्या. जेडीएसला १९ जागा मिळाल्या परंतु पक्षाचे मतदान १३.४ टक्के इतके राहिले. मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जवळपास ७ टक्के मतांचे अंतर आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक