शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

 आघाडीसाठी भाजपा-जेडीयूचा ५0-५० फॉर्म्युला, मित्रपक्षांनाही देणार सन्मानजनक जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:53 IST

अनेक दिवस  चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर भाजपा आणि जेडीयूने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे.

नवी दिल्ली - अनेक दिवस  चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर भाजपा आणि जेडीयूने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. या आघाडीच्या घोषणेमुळे बिहारमध्ये एनडीएचे पारडे भक्कम झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपाध्यक्षअमित शाह यांनी शुक्रवारी राजधानी नवी दिल्लीत या आघाडीची घोषणा केली.

\बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि जेडीयू बिहारमध्ये प्रत्येकी १७ जागांवर निवडणूक लढवतील. तर रामविलास पासवान यांच्या एलजेपी आणि  उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएसपीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी होऊन जागावाटप झालेले बिहार हे पहिले राज्य आहे. २०१४ साली भाजपा, एलजेपी आणि आरएलएसपी या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता आघाडीमध्ये जेडीयूसुद्धा सहभागी झाल्याने या पक्षांना काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. पैकी गेल्यावेळी २९ जागा लढवणाऱ्या भाजपाने आपल्या वाट्याच्या १२ जागा जेडीयूला दिल्या आहेत. २०१४ साली भाजपाने एकूण २२ जागांवर विजय मिळवला होता.देशातील बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यात जेडीयूला यश आले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाविरोधात भूमिका घेणाऱ्या जेडीयूला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. 

दरम्यान,  जागावाटपाबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. येत्या काही दिवसांत जागावाटपाला अंतिम रूप दिले जाईल असे अमित शाह यंनी सांगितल्याची माहिती आरएलएसपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी दिली. 

   

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारAmit Shahअमित शाहBJPभाजपा