शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 08:18 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. 

Congress BJP EVM News: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेली असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आहे. 

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधींना लक्ष्य केले. "काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राहुल गांधींसह इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा आणि जाहीर करायला हवं की, ते मतपत्रिकेवर निवडणुका होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही", असे भाटिया म्हणाले. 

"असेच बोलत राहिले, तर त्यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यांनी असं केलं नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे आरोप बिनवुडाचे ठरतील", असेही गौरव भाटिया म्हणाले.

"काँग्रेसने हा मुद्दा घेऊन न्यायालयात जायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएम मशीनच्या बाजूने निकाल दिला आहे. हा केवढा मोठा विरोधाभास आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी त्याच दिवशी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले, ज्या दिवशी प्रियांका गांधी लोकसभेत शपथ घेत होत्या", अशा शब्दात भाटिया यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEVM Machineईव्हीएम मशीनBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग