शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 08:18 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. 

Congress BJP EVM News: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेली असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आहे. 

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधींना लक्ष्य केले. "काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राहुल गांधींसह इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा आणि जाहीर करायला हवं की, ते मतपत्रिकेवर निवडणुका होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही", असे भाटिया म्हणाले. 

"असेच बोलत राहिले, तर त्यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यांनी असं केलं नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे आरोप बिनवुडाचे ठरतील", असेही गौरव भाटिया म्हणाले.

"काँग्रेसने हा मुद्दा घेऊन न्यायालयात जायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएम मशीनच्या बाजूने निकाल दिला आहे. हा केवढा मोठा विरोधाभास आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी त्याच दिवशी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले, ज्या दिवशी प्रियांका गांधी लोकसभेत शपथ घेत होत्या", अशा शब्दात भाटिया यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEVM Machineईव्हीएम मशीनBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग