शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 08:18 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. 

Congress BJP EVM News: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला. महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेली असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आहे. 

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधींना लक्ष्य केले. "काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राहुल गांधींसह इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा आणि जाहीर करायला हवं की, ते मतपत्रिकेवर निवडणुका होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही", असे भाटिया म्हणाले. 

"असेच बोलत राहिले, तर त्यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यांनी असं केलं नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे आरोप बिनवुडाचे ठरतील", असेही गौरव भाटिया म्हणाले.

"काँग्रेसने हा मुद्दा घेऊन न्यायालयात जायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएम मशीनच्या बाजूने निकाल दिला आहे. हा केवढा मोठा विरोधाभास आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी त्याच दिवशी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले, ज्या दिवशी प्रियांका गांधी लोकसभेत शपथ घेत होत्या", अशा शब्दात भाटिया यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEVM Machineईव्हीएम मशीनBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग