शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:11 IST

खर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात

बेळगाव : देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठविलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली योजना लाभदायी आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. बेळगावात येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १६,००० कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते, तर १६ हजार कोटींतील १२ ते १३ हजार कोटी गायब झाले असते, परंतु आमच्या सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.मोदी म्हणाले, भाजपाचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत, अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प २०१४ मध्ये २५,००० कोटी रुपयांचा होता. जो यंदा १ लाख २५,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते.

कर्नाटकमध्ये सध्या रेल्वेच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा-बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वेसेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल,असे ते म्हणाले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

काँग्रेसवर टीकाखर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत, असे सांगून मोदीला केव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले, तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे मोदी यांनी मिश्कीलपणे सांगितले.

स्टार्टअपची सुरुवात१०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून, याचा श्रीगणेशा बाबूराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा