शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:11 IST

खर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात

बेळगाव : देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठविलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली योजना लाभदायी आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. बेळगावात येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १६,००० कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते, तर १६ हजार कोटींतील १२ ते १३ हजार कोटी गायब झाले असते, परंतु आमच्या सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.मोदी म्हणाले, भाजपाचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत, अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प २०१४ मध्ये २५,००० कोटी रुपयांचा होता. जो यंदा १ लाख २५,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते.

कर्नाटकमध्ये सध्या रेल्वेच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा-बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वेसेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल,असे ते म्हणाले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

काँग्रेसवर टीकाखर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत, असे सांगून मोदीला केव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले, तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे मोदी यांनी मिश्कीलपणे सांगितले.

स्टार्टअपची सुरुवात१०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून, याचा श्रीगणेशा बाबूराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा