शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:11 IST

खर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात

बेळगाव : देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठविलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली योजना लाभदायी आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. बेळगावात येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १६,००० कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते, तर १६ हजार कोटींतील १२ ते १३ हजार कोटी गायब झाले असते, परंतु आमच्या सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.मोदी म्हणाले, भाजपाचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत, अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प २०१४ मध्ये २५,००० कोटी रुपयांचा होता. जो यंदा १ लाख २५,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते.

कर्नाटकमध्ये सध्या रेल्वेच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा-बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वेसेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल,असे ते म्हणाले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

काँग्रेसवर टीकाखर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत, असे सांगून मोदीला केव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले, तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे मोदी यांनी मिश्कीलपणे सांगितले.

स्टार्टअपची सुरुवात१०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून, याचा श्रीगणेशा बाबूराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा