शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:11 IST

खर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात

बेळगाव : देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठविलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली योजना लाभदायी आहे. भाजपचे डबल इंजिनचे सरकार म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. बेळगावात येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण १६,००० कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते, तर १६ हजार कोटींतील १२ ते १३ हजार कोटी गायब झाले असते, परंतु आमच्या सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.मोदी म्हणाले, भाजपाचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत, अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प २०१४ मध्ये २५,००० कोटी रुपयांचा होता. जो यंदा १ लाख २५,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते.

कर्नाटकमध्ये सध्या रेल्वेच्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा-बेळगाव-घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वेसेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल,असे ते म्हणाले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.

काँग्रेसवर टीकाखर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत, असे सांगून मोदीला केव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले, तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे मोदी यांनी मिश्कीलपणे सांगितले.

स्टार्टअपची सुरुवात१०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून, याचा श्रीगणेशा बाबूराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा