शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:22 IST

Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल.

गुवाहाटी: दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण, त्यापूर्वीच असामच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने (PCB)  राज्यातील हिरवे वगळता सर्व प्रकारचे फटाके फोडणे आणि विकण्या पूर्णपणे बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण(NGT) च्या निर्देशांचे पालन करताना, सणासुदीच्या काळात वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहील. पीसीबीचे अध्यक्ष अरुप कुमार मिश्रा म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची आहे. पीसीबीने केवळ सल्ला आणि सूचना जारी केल्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने फटाक्यांचा वापर थांबला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात केलेल्या दैनंदिन कारवाईचा अहवालही पीसीबीला सादर करावा. तसेच, दिवाळीच्या दिवशी लोक दोन तास हिरवे फटाके फोडू शकतात, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी

ऑक्टोबरच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत संभाव्य बिघाड लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच राष्ट्रीय राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "गेल्या 3 वर्षांपासून दिवाळी दरम्यान दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक परिस्थिती पाहता, यावेळी देखील सर्व प्रकारचे फटाके वापरावर बंदी असेल."

 

टॅग्स :AssamआसामDiwaliदिवाळी 2021BJPभाजपाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल