शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘त्यांना’ राज्यघटना आणि लोकशाही प्रक्रिया नको आहे - राहुल गांधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 11:15 IST

केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल,  असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

वायनाड (केरळ) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अन्य सर्व राष्ट्र विचार चिरडायचे आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रिया नको आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ते येथे एका प्रचारसभेत बोलत होते. केरळचा राज्यकारभार नागपुरातून का चालवला जावा, असा सवाल करून ते म्हणाले की, केरळचा राज्यकारभार त्याची शहरे आणि खेड्यांद्वारे चालवला गेला पाहिजे. केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल,  असा सवालही त्यांनी केला.

खरेतर केरळी जनतेने भारताला हेच शिकवले आहे. सरकार लोकांशी जेवढे जवळ असेल तेवढे ते प्रभावी असेल, असे ते म्हणाले. भाजप, संघाला राष्ट्राविषयीचे अन्य सर्व विचार चिरडायचे आहेत. त्यामुळे त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रियेपासून मुक्ती हवी आहे, असा दावा त्यांनी केला. वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेले राहुल येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीच नाहीभाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीही नाही, परंतु २०३६ ऑलिम्पिकसाठी बोली लावण्याबद्दल ते बोलत आहेत, असा घणाघात राहुल यांनी केंद्रावर केला. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजप उत्सुक आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यादरम्यान त्यांनी थलूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारची गरिबांसाठी काय धोरणे आहेत, असा सवाल त्यांनी केला.

एक नेता ही संकल्पनाही देशवासीयांचा अपमानसत्ताधारी भाजपने देशावर ‘एक नेता’ ही कल्पना लादल्याचा आरोप करत हा देशातील जनतेचा ‘अपमान’ असल्याचे राहुल म्हणाले. भारत हा फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे व प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :KeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस