शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

‘त्यांना’ राज्यघटना आणि लोकशाही प्रक्रिया नको आहे - राहुल गांधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 11:15 IST

केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल,  असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

वायनाड (केरळ) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अन्य सर्व राष्ट्र विचार चिरडायचे आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रिया नको आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ते येथे एका प्रचारसभेत बोलत होते. केरळचा राज्यकारभार नागपुरातून का चालवला जावा, असा सवाल करून ते म्हणाले की, केरळचा राज्यकारभार त्याची शहरे आणि खेड्यांद्वारे चालवला गेला पाहिजे. केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल,  असा सवालही त्यांनी केला.

खरेतर केरळी जनतेने भारताला हेच शिकवले आहे. सरकार लोकांशी जेवढे जवळ असेल तेवढे ते प्रभावी असेल, असे ते म्हणाले. भाजप, संघाला राष्ट्राविषयीचे अन्य सर्व विचार चिरडायचे आहेत. त्यामुळे त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रियेपासून मुक्ती हवी आहे, असा दावा त्यांनी केला. वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेले राहुल येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

भाजपच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीच नाहीभाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीही नाही, परंतु २०३६ ऑलिम्पिकसाठी बोली लावण्याबद्दल ते बोलत आहेत, असा घणाघात राहुल यांनी केंद्रावर केला. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजप उत्सुक आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यादरम्यान त्यांनी थलूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारची गरिबांसाठी काय धोरणे आहेत, असा सवाल त्यांनी केला.

एक नेता ही संकल्पनाही देशवासीयांचा अपमानसत्ताधारी भाजपने देशावर ‘एक नेता’ ही कल्पना लादल्याचा आरोप करत हा देशातील जनतेचा ‘अपमान’ असल्याचे राहुल म्हणाले. भारत हा फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे व प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :KeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस