शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला डावलल्याने भाजपाचा पराभव - रमण सिंह

By admin | Updated: February 12, 2015 10:44 IST

दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी छत्तीसगडचे भाजपा नेते व मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी भाजपाशासीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे. पक्षाने दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला निवडणुकीच्या मैदानात उतरवले नाही व त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला असे परखड मत व्यक्त करत रमण सिंह यांनी पक्षाला 'घरचा आहेर' दिला आहे. 
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला प्रोजेक्ट न करणे ही भाजपाची सर्वात मोठी चूक होती असे रमण सिंह यांचे म्हणणे आहे. दिल्लीत भाजपाने वीज, पाणी, कायदा व सुव्यवस्था अशा स्थानिक समस्यांमध्ये लक्ष घालून प्रचार कराया हवा होता असे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील निकालाचे परिणाम राष्ट्रीय राजकारणावर पडतील का असा प्रश्न विचारले असता रमण सिंह म्हणाले, आप सध्या फक्त दिल्ली पुरताच मर्यादीत आहे. देशातील अन्य भागांमध्ये जनाधार वाढवण्यासाठी आपला आणखी मेहनत करावी लागेल. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीही दिल्लीतील पराभवावर नाराजी व्यक्त केली.  केंद्रीय मंत्री प्रसारमाध्यमांसमोर बसून केजरीवाल झोपडीधारकांना कसे फसवत आहेत हे सांगत बसले. पण त्यांनी हे काम थेट झोपडपट्टी परिसरात जाऊन केले पाहिजे होते असे संघाच्या एका नेत्याने सांगितले.  दिल्लीतील मतदारांसाठी आमच्याकडे घोषणापत्र नव्हते, दिल्लीकरांना आता काम करणारा पक्ष हवा होता, त्यांना राष्ट्रबांधणीमध्ये फारसा रस नव्हता असे मत दिल्लीतील संघाच्या एका कार्यकर्त्याने मांडले.