शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:26 IST

BJP counterattacks Congress : आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भाजपाने मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे देशभरातील राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात, असा टोला ठाकूर यांनी लगावला.

अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस भारतीय लोकांना एवढं का कमी लेखू इच्छित आहे. भारतीय मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस केवळ घुसखोरांच्या वोट बँकेपुरतीच मर्यादित राहू इच्छित आहे. मतदार याद्यांमधून बनावट मतदारांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या मतदारांचा मताधिकार सुरक्षित राहावा यासाठी मतदार याद्या पुनरीक्षणास (SIR) सुरुवात झाली तर काँग्रेस त्याला विरोध करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात. राहुल गांधी यांनी ‘भयंकर’ समोर आणलं असं काल काँग्रेसचे कुणीतरी नेते म्हणाले. मात्र राहुल गांधी यांनी भयंकर नाही तर ब्लंडर केलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत संशय निर्माण केला. आता पुन्हा एकदा खोटं बोलत आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा उरलेला नाही.

यावेळी अनुराग ठाकूर यांनी काही बनावट मतदारांची उदाहरणंही दिली. ते म्हणाले की, रायबरेली येथील मोहम्मद कैफ खान यांचं बूथ क्रमांक ८३, १५१, २१८ अशा ठिकाणी नाव आहे. तर घर क्रमांक १८९ पत्त्यावर ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. तसेच बंगालमधील डायमंड हार्बर येथे घर क्रमांक ००११, बुथ क्रमांक १०३ लर अनेक धर्माच्या लोकांची नावं नोंदवलेली आहेत. रायबरेलीत एकाच घरामध्ये ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी विचारला.

खऱ्या भारतीय आणि खऱ्या नागरिकांनाच मताधिकार मिळाला पाहिजे. रायबरेलीमध्ये बरेच लोक ३-४ बूथवर मतदान करतात. डायमंड हार्बरमध्ये खुर्शिद आलम हे नाव वारंवार मतदार यादीत येतं. मात्र त्यांच्या वडिलांचं नाव बदललं जातं. एकाच जागी ५२ मतांची नोंद आहे, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.

महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये काँग्रेसने मतदारांची नावं वाढवली जात असल्याचा आरोप केला होता. असे आऱोप करून काँग्रेस पक्ष मतदारांचा अपमान करत आहे. राहुल गांधी आणि ते सादर करत असलेले आकडे खोटे आहेत, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच काँग्रेसने कर्नाटकमध्ये या मुद्द्यावरून आपल्याच नेत्याला पक्षातून बाहेरची वाट दाखवली, अशी टीकाही त्यांनी केली.    

टॅग्स :Electionनिवडणूक 2024BJPभाजपाAnurag Thakurअनुराग ठाकुरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग