शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:26 IST

BJP counterattacks Congress : आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भाजपाने मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे देशभरातील राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात, असा टोला ठाकूर यांनी लगावला.

अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस भारतीय लोकांना एवढं का कमी लेखू इच्छित आहे. भारतीय मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस केवळ घुसखोरांच्या वोट बँकेपुरतीच मर्यादित राहू इच्छित आहे. मतदार याद्यांमधून बनावट मतदारांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या मतदारांचा मताधिकार सुरक्षित राहावा यासाठी मतदार याद्या पुनरीक्षणास (SIR) सुरुवात झाली तर काँग्रेस त्याला विरोध करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात. धूळ यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात. राहुल गांधी यांनी ‘भयंकर’ समोर आणलं असं काल काँग्रेसचे कुणीतरी नेते म्हणाले. मात्र राहुल गांधी यांनी भयंकर नाही तर ब्लंडर केलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत संशय निर्माण केला. आता पुन्हा एकदा खोटं बोलत आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा उरलेला नाही.

यावेळी अनुराग ठाकूर यांनी काही बनावट मतदारांची उदाहरणंही दिली. ते म्हणाले की, रायबरेली येथील मोहम्मद कैफ खान यांचं बूथ क्रमांक ८३, १५१, २१८ अशा ठिकाणी नाव आहे. तर घर क्रमांक १८९ पत्त्यावर ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. तसेच बंगालमधील डायमंड हार्बर येथे घर क्रमांक ००११, बुथ क्रमांक १०३ लर अनेक धर्माच्या लोकांची नावं नोंदवलेली आहेत. रायबरेलीत एकाच घरामध्ये ४७ मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी विचारला.

खऱ्या भारतीय आणि खऱ्या नागरिकांनाच मताधिकार मिळाला पाहिजे. रायबरेलीमध्ये बरेच लोक ३-४ बूथवर मतदान करतात. डायमंड हार्बरमध्ये खुर्शिद आलम हे नाव वारंवार मतदार यादीत येतं. मात्र त्यांच्या वडिलांचं नाव बदललं जातं. एकाच जागी ५२ मतांची नोंद आहे, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला.

महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये काँग्रेसने मतदारांची नावं वाढवली जात असल्याचा आरोप केला होता. असे आऱोप करून काँग्रेस पक्ष मतदारांचा अपमान करत आहे. राहुल गांधी आणि ते सादर करत असलेले आकडे खोटे आहेत, असा आरोपही अनुराग ठाकूर यांनी केला. तसेच काँग्रेसने कर्नाटकमध्ये या मुद्द्यावरून आपल्याच नेत्याला पक्षातून बाहेरची वाट दाखवली, अशी टीकाही त्यांनी केली.    

टॅग्स :Electionनिवडणूक 2024BJPभाजपाAnurag Thakurअनुराग ठाकुरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग