शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:27 IST

Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले.

Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद नगरपालिका अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची सक्रीय सहभाग नोंदवत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, भाजपाच्या उमेदवाराचा सपाटून पराभव झाला. या निवडणुकीत भाजपा उमेदवार केवळ १ हजार ३५२ मते मिळून थेट पाचव्या स्थानी गेला. काँग्रेस, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनाही भाजपा उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली.

समाजवादी पक्षाचे उमेदवार अमीर अराफत यांनी ८ हजार ९०६ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीच्या निकालानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर खोचक टीका केली. अखिलेश यादव म्हणाले की, महमूदाबादमध्ये सपाचा पक्षाचा विजय हा मनोबल वाढवणारा आहे. भाजपा पाचव्या क्रमांकावर येणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी केले. 

भाजपात तिकीट वाटपावरून वाद आणि बंडखोरी

महमूदाबाद आणि मिश्रिख येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. महमूदाबाद येथील निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. येथे भाजपाने माजी खासदार राजेश वर्मा यांचे निकटवर्तीय संजय वर्मा यांना तिकीट दिले. परंतु, भाजपाच्या या निर्णयापासूनच वादाला तोंड फुटले. पक्ष संघटनेत बराच काळ सक्रिय असलेले अनेक चेहरे उमेदवार निवडीच्या शर्यतीत होते. परंतु, त्यांच्यापैकी कुणालाच संधी देण्यात आली नाही.

बंडखोरांनी अधिकृत उमेदवारापेक्षा मिळवली जास्त मते

तिकीट वाटपावर नाराज झालेल्यांपैकी अतुल वर्मा आणि अमरीश गुप्ता यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले. निवडणूक निकालांनंतर असे दिसून आले की, जनतेने भाजपाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा या बंडखोर उमेदवारांना जास्त पाठिंबा दिला. अतुल वर्मा आणि अमरीश गुप्ता अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर भाजपाचे अधिकृत उमेदवार पाचव्या स्थानी राहिले. या निवडणूक भाजपाचे स्थानिक संघटन विभाजित दिसले. पक्षातील गटबाजीही उघड झाली. पक्षात असंतोष वाढला. या सर्वांचा निकालांवर थेट परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपा उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली. 

दरम्यान, मिश्रिख येथे भाजपाने विजय मिळवला. या भागात नैमिषारण्यसारख्या प्रमुख धार्मिक स्थळाचा परिसर असल्यामुळे याचे महत्त्व अधिक असल्याचे म्हटले जात आहे. अयोध्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाला ही जागा राखणे आव्हानात्मक होते. भाजपाने स्थानिक आमदार रामकृष्ण भार्गव यांच्या सून सीमा भार्गव यांना उमेदवारी दिली. सपाने उमेदवार उतरवला होता. परंतु तो तुलनेने नवीन आणि अज्ञात चेहरा होता. अखेर सीमा भार्गव ३ हजार २०० मतांनी विजयी झाल्या.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाElectionनिवडणूक 2024