शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 12:46 IST

राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुढील तीन महिने आपल्या सर्व आमदारांच्या कार्याचा अहवाल तयार करणार आहे. ज्या ठिकाणी आमदाराविरोधात वातावरण असेल तिथे नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला बिहारमधील निवडणुकीची काळजी सतावत आहे. त्यामुळे ही योजना करण्यात आली आहे.

बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडची साथ मिळालेली आहे. नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्यासाठी भाजप पूर्णपणे तयार आहे. मात्र संघटनात पक्षाला कमकुवत होऊ द्यायचे नाही, असं धोरण भाजप राबवत आहे. त्यासाठी आमदारांच्या कार्याचा अहवाल तपासला जाणार आहे.

बिहारमध्ये जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्यासोबत युती असताना देखील विधानसभा निवडणुकीची लढत खडतर होऊ शकते, असा अंदाज भाजपमधून व्यक्त कऱण्यात येत आहे. राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनुभव भाजपच्या पाठिशीमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत निवडणूक लढवूनही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. बिहारमध्ये काहीही झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच होतील, असं भाजपने निश्चित केले आहे. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भाजप पक्ष संघटनेवर परिणाम होऊ देणार नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीत भाजपला जदयूच्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.