शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 14:05 IST

प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दीपक बाबरिया आम्हाला पक्ष चालवू देत नव्हते. माझ्या सल्ल्याने कोणतीच नियुक्ती केली जात नव्हती. प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, भ्रष्ट लोकांच्या इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही परस्पर सहमती नाही. ज्या काँग्रेस पक्षात लोकशाही नाही किंवा सेवेचा विचार नाही. त्या पक्षात मूल्यांना महत्त्व देणारे लोक अस्तित्वातच राहू शकत नाहीत. सहा दशके देशाला लुटणारी काँग्रेस आता अंताकडे वाटचाल करत आहे, असे वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

दुसरीकडे, भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे घडणारच होते. काँग्रेसला शिव्या देऊन ज्यांचा राजकीय जन्म झाला, तो आम आदमी पक्ष (आप) आणि अरविंद केजरीवाल यांनी आज केवळ मोदींच्या भीतीपोटी एकमेकांची गळभेट घेण्यास मजबूर झाले आहे. ही काँग्रेसच्या मूर्खपणाची पराकाष्ठा होती.

पुढे हर्षवर्धन म्हणाले की, दिल्लीत काँग्रेस-आप यांच्यात आघाडी कधीच नव्हती. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांनी ती कधीच मान्य केली नाही. आज मी गॅरंटीने सांगतो की, 4 जूनच्या दुपारपर्यंत या ठगआघाडीचे नेते एकजूट राहतील. त्यानंतर पुन्हा इतरांना शिव्या देणे सुरू करतील. अरविंदर सिंग लवली यांनी पक्ष सोडणे, ही फक्त एक सुरुवात आहे. आता अशा अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांचा अंतरात्मा जागा होईल.

(काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा) 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४