शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:47 IST

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकसागरात बुडालेला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले, असाही दावा भाजपने केला.

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा आपल्या राजकीय हेतूसाठी वापर केला, असा आरोप भाजपने केला आहे. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकसागरात बुडालेला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले, असाही दावा भाजपने केला.

भाजपच्या आयटीचे सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी राजकीय हेतूसाठी सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचाही वापर केला. गांधी घराणे व काँग्रेस शीखांचा द्वेष करतात, हे इतिहासातील उदाहरणांवरून सिद्ध झाले. मालवीय यांच्या आरोपांबद्दल काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी म्हटले आहे की, सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदी तीरावर जागा उपलब्ध करून द्या, ही मागणी केंद्राने  नाकारली. राहुल गांधी हे खासगी दौऱ्यावर आहेत. त्याचा भाजपला  त्रास का होतो, असा सवाल त्यांनी विचारला. '

मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे खासगीपण जपले : काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे खासगीपण जपण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधानांच्या अस्थिविसर्जनप्रसंगी उपस्थित नव्हते, असे त्या पक्षाने म्हटले आहे. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले, याची आठवण काँग्रेसने करून दिली.मनमोहन सिंग यांच्या मुद्द्यावरून वाद घालू नका : अभिजीत मुखर्जीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर वादाचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. मात्र, अशा प्रकारे कोणीही वाद निर्माण करू नये, असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी सोमवारी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग