शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

भारत जोडो न्याय यात्रेत घुसले भाजप कार्यकर्ते; राहुल गांधीही थेट भिडले, दिली Flying Kiss...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 17:46 IST

भारत जोडो न्याय यात्रेत भाजप कार्यकर्त्यांचा गट शिरला, यावेळी राहुल गांधी बसमधून उतरले अन्...

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय (Bharat Jodo Yatra) यात्रेवर रविवारी(दि.21) कथितरित्या हल्ला झाला. मणिपूरमधून सुरू झालेली यात्रा सध्या असामच्या सुनितपूरमध्ये आहे. यावेळी काही भाजप कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन काँग्रेसच्या यात्रेत शिरले. बसमध्ये राहुल गांधींना पाहताच त्यांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदी च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. 

भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओनुसार, असामच्या सुनितपूरमधून जात असताना काही लोक हातात भाजप आणि श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे घेऊन भारत जोडो यात्रेत शिरले. यावेळी त्यांनी गाड्या अडवल्या आणि घोषणाबाजी केली. राहुल गांधी बसमधून हा सर्व प्रकार पाहत होते. दरम्यान, या लोकांनी राहुल गांधींना पाहताच घोषणाबाजी सुरू केली. 

यानंतर राहुल गांधींनी बसमधून खाली उतरतात आणि त्या गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा कर्मचारी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा बसमध्ये बसवले. राहुल गांधी यांनीही त्यांच्या एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये काही लोक हातात भाजपचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधी त्यांना बसमधून Flying Kiss देतात आणि पुढे निघून जातात. या व्हिडिओसोबत त्यांनी प्रेमाचे दुकान सर्वांसाठी खुले आहे, असे कॅप्शनही दिले आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजवर आरोप केला आहे. काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर सुनितपूर इथे हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेच असं कृत्य करत आहेत. मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू, अशी स्पष्टोक्ती जयराम रमेश यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपाAssamआसाम