शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

असंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 03:25 IST

विरोधकांचे राष्ट्रपतींना निवेदन : विधेयके सभागृहात परत मांडा

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेससह १५ राजकीय पक्षांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन सरकारने संसदीय आणि संवैधानिक व्यवस्थांकडे दुर्लक्ष करून कृषीसंबंधी विधेयके संमत केली, असा आरोप केला.

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात जी प्रक्रिया अवलंबली गेली, त्यामुळे विधेयक आवाजी मतांनी संमत झाले ना मत विभाजनाद्वारे. घटनाविरोधी पद्धतीने संमत झालेल्या या विधेयकांवर तुम्ही स्वाक्षरी करून त्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

राष्ट्रपतींशी भेट झाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेचा तपशील देताना म्हटले की, आम्ही राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी जी प्रक्रिया अवलंबली त्यानुसार ती विधेयके संमत झाल्याचे मानता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. कारण विरोधी पक्षांचे सदस्य मत विभाजनाची मागणी करत होते व त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विधेयक आवाजी मतदानाने संमत झाल्याचा सरकारचा दावा योग्य नाही. कारण सभागृहात त्यावेळी एवढा गोंधळ व आरडाओरड होती की, सदस्य विधेयकाच्या बाजूने आहेत की त्याविरोधात हे समजत नव्हते.

आझाद यांनी असेही म्हटले की, सभागृहात बहुमत विरोधकांकडे होते. कारण त्यावेळी भाजपच्या बाजूने फक्त दोन राजकीय पक्ष होते व राहिलेले विरोधकांच्या बाजूने होते.

चर्चा करून निर्णय व्हावाविरोधकांनी राष्ट्रपतींकडे आग्रह केला की, ही विधेयके पुन्हा सभागृहात आणली जावीत. नव्याने त्यावर चर्चा करून संविधानानुसार सभागृहात निर्णय व्हावा. राष्ट्रपतींची प्रतिक्रिया काय होती, असे विचारल्यावर आझाद म्हणाले, ते याबाबतीत आवश्यक ती पावले उचलतील, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाRamnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेस