शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

असंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 03:25 IST

विरोधकांचे राष्ट्रपतींना निवेदन : विधेयके सभागृहात परत मांडा

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेससह १५ राजकीय पक्षांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन सरकारने संसदीय आणि संवैधानिक व्यवस्थांकडे दुर्लक्ष करून कृषीसंबंधी विधेयके संमत केली, असा आरोप केला.

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात जी प्रक्रिया अवलंबली गेली, त्यामुळे विधेयक आवाजी मतांनी संमत झाले ना मत विभाजनाद्वारे. घटनाविरोधी पद्धतीने संमत झालेल्या या विधेयकांवर तुम्ही स्वाक्षरी करून त्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

राष्ट्रपतींशी भेट झाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेचा तपशील देताना म्हटले की, आम्ही राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी जी प्रक्रिया अवलंबली त्यानुसार ती विधेयके संमत झाल्याचे मानता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. कारण विरोधी पक्षांचे सदस्य मत विभाजनाची मागणी करत होते व त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विधेयक आवाजी मतदानाने संमत झाल्याचा सरकारचा दावा योग्य नाही. कारण सभागृहात त्यावेळी एवढा गोंधळ व आरडाओरड होती की, सदस्य विधेयकाच्या बाजूने आहेत की त्याविरोधात हे समजत नव्हते.

आझाद यांनी असेही म्हटले की, सभागृहात बहुमत विरोधकांकडे होते. कारण त्यावेळी भाजपच्या बाजूने फक्त दोन राजकीय पक्ष होते व राहिलेले विरोधकांच्या बाजूने होते.

चर्चा करून निर्णय व्हावाविरोधकांनी राष्ट्रपतींकडे आग्रह केला की, ही विधेयके पुन्हा सभागृहात आणली जावीत. नव्याने त्यावर चर्चा करून संविधानानुसार सभागृहात निर्णय व्हावा. राष्ट्रपतींची प्रतिक्रिया काय होती, असे विचारल्यावर आझाद म्हणाले, ते याबाबतीत आवश्यक ती पावले उचलतील, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाRamnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेस