शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

असंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 03:25 IST

विरोधकांचे राष्ट्रपतींना निवेदन : विधेयके सभागृहात परत मांडा

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेससह १५ राजकीय पक्षांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन सरकारने संसदीय आणि संवैधानिक व्यवस्थांकडे दुर्लक्ष करून कृषीसंबंधी विधेयके संमत केली, असा आरोप केला.

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात जी प्रक्रिया अवलंबली गेली, त्यामुळे विधेयक आवाजी मतांनी संमत झाले ना मत विभाजनाद्वारे. घटनाविरोधी पद्धतीने संमत झालेल्या या विधेयकांवर तुम्ही स्वाक्षरी करून त्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

राष्ट्रपतींशी भेट झाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेचा तपशील देताना म्हटले की, आम्ही राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी जी प्रक्रिया अवलंबली त्यानुसार ती विधेयके संमत झाल्याचे मानता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. कारण विरोधी पक्षांचे सदस्य मत विभाजनाची मागणी करत होते व त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विधेयक आवाजी मतदानाने संमत झाल्याचा सरकारचा दावा योग्य नाही. कारण सभागृहात त्यावेळी एवढा गोंधळ व आरडाओरड होती की, सदस्य विधेयकाच्या बाजूने आहेत की त्याविरोधात हे समजत नव्हते.

आझाद यांनी असेही म्हटले की, सभागृहात बहुमत विरोधकांकडे होते. कारण त्यावेळी भाजपच्या बाजूने फक्त दोन राजकीय पक्ष होते व राहिलेले विरोधकांच्या बाजूने होते.

चर्चा करून निर्णय व्हावाविरोधकांनी राष्ट्रपतींकडे आग्रह केला की, ही विधेयके पुन्हा सभागृहात आणली जावीत. नव्याने त्यावर चर्चा करून संविधानानुसार सभागृहात निर्णय व्हावा. राष्ट्रपतींची प्रतिक्रिया काय होती, असे विचारल्यावर आझाद म्हणाले, ते याबाबतीत आवश्यक ती पावले उचलतील, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाRamnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेस