शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:22 IST

Biju Patnaik: १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने काश्मीरवरील ताब्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या फौजांना काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराला तातडीने श्रीनगर येथे पोहोचणे आवश्यक होते. त्यावेळी भारतीय जवानांना काश्मीरमध्ये उतरवण्याची जबाबदारी बिजू पटनाईक यांच्यावर सोपवण्यात आली होती.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच या पहलगाममधील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. अशा परिस्थितीत याआधी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षावेळी घडलेल्या थरारक प्रसंगांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. असाच एक प्रसंग आहे ज्यात पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात सहभागी झालेली व्यक्ती पुढे राजकारणात जाऊन एका राज्याची मुख्यमंत्रीही झाली. या व्यक्तीचं नाव आहे बिजू पटनाईक.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने काश्मीरवरील ताब्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या फौजांना काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराला तातडीने श्रीनगर येथे पोहोचणे आवश्यक होते. त्यावेळी भारतीय जवानांना काश्मीरमध्ये उतरवण्याची जबाबदारी बिजू पटनाईक यांच्यावर सोपवण्यात आली होती. पेशाने पायलट असलेल्या आणि नंतर स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झालेल्या पटनाईक यांनी अत्यंत हिमतीने ही जोखमीची मोहीम पार पाडली होती. पुढे बिजू पटनाईक हे राजकारणात उतरले. तसेच मजल दरमजल करत केंद्रीय मंत्री आणि ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.

दरम्यान, बिजू पटनाईक यांची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच थरारक आहे. ते आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून लाहोरला विमानाने जायचे. तसेच लग्नावेळीही त्यांनी चक्क विमानांचा ताफाच लाहोरला नेला होता. एवढंच नाही त्यापैकी एका विमानाचं सारथ्य ते स्वत: करत होते. एवढंच नाही तर एकता इंडोनेशियामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना बिजू पटनाईक यांनी पत्नीला सोबत घेत विमानाने थेट इंडोनेशियापर्यंत मजल मारली होती. तसेच तिथून एका नेत्याची सुखरूपपणे सुटका केली होती. हा नेता पुढे जाऊन इंडोनेशियाचा पंतप्रधान बनला होता.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानairplaneविमान