शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बिहारचा पूल पडला नाही आम्ही पाडला; तेजस्वी यादव आले नितीशकुमारांच्या मदतीला धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 10:02 IST

गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. तेव्हा तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते होते. आता सत्तेत बसलेत.

पटना: बिहारच्या भागलपूरमध्ये १७०० कोटी रुपयांच्या खर्चाचा नदीवर बनविला जात असलेल्या पुलाचा एक भाग रविवारी सायंकाळी कोसळला. गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. आताही तसेच होऊ नये म्हणून बिहार सरकारने सुरुवातीला चौकशीचे आदेश दिले होते, परंतू आता तो पूल आम्हीच पाडला असल्याचा दावा बिहार सरकार करत आहे. 

पूल कोसळल्याने बिहारमध्ये पुन्हा एकदा विरोधक टीका करू लागले आहेत. यावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि आता नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले तेजस्वी यादव धावून आले आहेत. जेव्हा वादळामुळे पूल कोसळलेला तेव्हा मीच आवाज उठविलेला. आता सत्तेत आल्यावर आम्ही आयआयटी रुडकीला याची चौकशी करायला सांगितली होती. त्यांचा अहवाल येत आहे. त्यापूर्वी त्यांनी या पूलाच्या निर्माणामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे या पुलाचा भाग पाडण्यात आला आहे, असे यादव म्हणाले.

नितीश सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्याचे पाहून तेजस्वी याजव आणि रस्ते निर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्यमंसचिव प्रत्यय अमृत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सारवासारव केली आहे. गेल्या वर्षी ३० एप्रिलला या पुलाचा एक हिस्सा कोसळला होता. ही घटना खूप चर्चेत आली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेता या नात्याने मी तो मुद्दा जोरदारपणे मांडला होता. सत्तेत आल्यावर आम्ही चौकशीचे आदेश दिले आणि तज्ज्ञांचे मत मागवले. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे पुलाचा काही भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यादव म्हणाले. 

रविवारी पुलाचा काही भाग पाडणे हा या कवायतीचा एक भाग होता, असे प्रत्यय यांनी सांगितले. अंतिम अहवाल आल्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहे. यासोबतच एफआयआर नोंदवण्याची कारवाईही केली जाणार आहे, असे ते म्हणाले.  

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार