शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बिहारचा पूल पडला नाही आम्ही पाडला; तेजस्वी यादव आले नितीशकुमारांच्या मदतीला धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 10:02 IST

गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. तेव्हा तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते होते. आता सत्तेत बसलेत.

पटना: बिहारच्या भागलपूरमध्ये १७०० कोटी रुपयांच्या खर्चाचा नदीवर बनविला जात असलेल्या पुलाचा एक भाग रविवारी सायंकाळी कोसळला. गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. आताही तसेच होऊ नये म्हणून बिहार सरकारने सुरुवातीला चौकशीचे आदेश दिले होते, परंतू आता तो पूल आम्हीच पाडला असल्याचा दावा बिहार सरकार करत आहे. 

पूल कोसळल्याने बिहारमध्ये पुन्हा एकदा विरोधक टीका करू लागले आहेत. यावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि आता नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले तेजस्वी यादव धावून आले आहेत. जेव्हा वादळामुळे पूल कोसळलेला तेव्हा मीच आवाज उठविलेला. आता सत्तेत आल्यावर आम्ही आयआयटी रुडकीला याची चौकशी करायला सांगितली होती. त्यांचा अहवाल येत आहे. त्यापूर्वी त्यांनी या पूलाच्या निर्माणामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे या पुलाचा भाग पाडण्यात आला आहे, असे यादव म्हणाले.

नितीश सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्याचे पाहून तेजस्वी याजव आणि रस्ते निर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्यमंसचिव प्रत्यय अमृत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सारवासारव केली आहे. गेल्या वर्षी ३० एप्रिलला या पुलाचा एक हिस्सा कोसळला होता. ही घटना खूप चर्चेत आली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेता या नात्याने मी तो मुद्दा जोरदारपणे मांडला होता. सत्तेत आल्यावर आम्ही चौकशीचे आदेश दिले आणि तज्ज्ञांचे मत मागवले. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे पुलाचा काही भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यादव म्हणाले. 

रविवारी पुलाचा काही भाग पाडणे हा या कवायतीचा एक भाग होता, असे प्रत्यय यांनी सांगितले. अंतिम अहवाल आल्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहे. यासोबतच एफआयआर नोंदवण्याची कारवाईही केली जाणार आहे, असे ते म्हणाले.  

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार