शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:58 IST

नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील.

पटना - बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निकालानंतर २ प्रश्न प्रामुख्याने राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. एक म्हणजे पुढील मुख्यमंत्री कोण असणार आणि दुसरे नवीन सरकारचा फॉर्म्युला कसा असणार? बिहारमध्ये यावेळी मुख्यमंत्री कुणीही बनेल परंतु कॅबिनेटचा फॉर्म्युला पूर्णपणे बदलावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच ५ पक्षाचे प्रतिनिधित्व असेल. त्याशिवाय भाजपाच्या कोट्यातील मंत्र्‍यांचीही संख्या कमी असू शकते. 

यंदा ६ आमदारावर १ मंत्रिपद

२०२० साली एनडीएला १२६ जागांवर विजय मिळाला होता. ज्यानंतर ३.५ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. बिहारमध्ये जास्तीत जास्त ३६ मंत्रिपदे आहेत. यावेळी एनडीएच्या वाट्याला १९८ जागा आल्या आहेत. या हिशोबाने प्रत्येक ६ आमदारांवर एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. मागील सरकारमध्ये जेडीयू १३, भाजपाकडे २२ मंत्रिपदे होती. यावेळी नवा फॉर्म्युला बनवला तर जेडीयू १५ आणि भाजपा १६, लोजपा ३ मंत्री बनवू शकतात. त्याशिवाय उपेंद्र कुशवाह आणि हम यांनाही एक मंत्रिपद मिळेल.

खातेवाटपातही यावेळी बदल झाल्याचे दिसून येईल. मागील वेळी भाजपाकडे जास्त खाती होती. भाजपाने २६ खाती घेतली होती. त्यात आता घट होईल. लोजपाला भाजपाच्या कोट्यातून एक मोठे खाते जाऊ शकते. मागील कॅबिनेटवेळी भाजपाकडे अर्थ आणि नियोजन, बांधकाम, महसूल, नगरविकास, उद्योग, आरोग्य, कृषी, विधी विभाग अशी खाती होती. जेडीयूकडे मागील कॅबिनेटमध्ये गृह, इंटेलिजेंस, जल संधारण, ग्रामविकास, शिक्षण यासारखी प्रमुख खाती होती. यावेळी यात खातेबदल होऊ शकतो. 

दरम्यान, नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. त्याचप्रकारे अन्य काही मंत्र्‍यांना डच्चू दिला जाऊ शकतो. भाजपाकडे ६ आमदारांच्या फॉर्म्युल्यावर १६ मंत्रिपदे येऊ शकतात त्यामुळे आधीच्या ५ मंत्र्‍यांना हटवावे लागेल. जेडीयूही काही मंत्रि‍पदात बदल करू शकतात. जेडीयू प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा निवडणूक जिंकलेत. त्यांनाही कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकते. 

किती उपमुख्यमंत्री असणार?

नितीश कुमार जेव्हा जेव्हा मजबूत स्थितीत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री ठेवतात. २०२० मध्ये जेव्हा नितीश कुमार कमकुवत होते तेव्हा भाजपाने २ उपमुख्यमंत्री बनवले होते. यावेळी भाजपा आणि नितीश कुमार दोघेही मजबूत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री असतील हा प्रश्न आहे. त्याशिवाय १९ जागा जिंकणाऱ्या लोजपाही उपमुख्यमंत्रिपदावर दावा करणार का हेदेखील काही दिवसांत कळेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar BJP's victory brings headaches; cabinet formula needs change?

Web Summary : Despite winning most seats in Bihar, BJP faces challenges. A new cabinet formula is needed with five parties represented. JDU and BJP may have fewer ministers. Deputy CM question lingers amid power dynamics.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार