शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?, नितीश कुमारांनी बोलावली खासदार, आमदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:49 IST

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली- 

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. याचाच एक भाग म्हणजे आज जदयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार 'राजद'च्या आमदारांनाही तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना राजधानी पाटणामध्येच राहण्यास सांगितलं आहे. भाजपासोबतच्या वादामुळे नितीश कुमार आता पुन्हा एकदा भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. 

भाजपापासून नितीश कुमार दूरचभाजपाच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी बिहारमध्ये रोड शो केला, बैठकाही घेतल्या पण याकडे नितीश कुमार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. भाजपा नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठका, माजी राष्ट्रपतींनी आयोजित केलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, राष्ट्रपतींचा शपथविधी, निती आयोगाची बैठक अशा सर्व महत्वाच्या कार्यक्रमांना नितीश कुमार यांची अनुपस्थिती होती. 

मोदी कॅबिनेटपासूनही नितीश कुमार दूरचएका बाजूला भाजपा-जदयूमध्ये सारंकाही आलबेल नाही अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे जदयूचे राष्ट्रीय ललन सिंह यांनी भाजपासोबत सुसंवाद असल्याचा दावा केला आहे. "भाजपासोबत ऑल इज वेल आहे. आम्ही केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही. २०१९ मध्येच ठरलं होतं की जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. जदयू विरोधात षडयंत्र रचली जात आहेत. पण त्याचा पक्षावर काहीच परिणाम होणार नाही. याआधी चिराग पासवान मॉडल आणला गेला. आता आणखी एक मॉडल आणण्याची तयारी केली जात आहे. पण जदयू विरोधात कोणतंच मॉडल यशस्वी होणार नाही", असं ललन सिंह म्हणाले. 

निती आयोगाच्या बैठकीलाही नितीश कुमार अनुपस्थितराजधानी दिल्लीत आज निती आयोगाची बैठक बोलवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. नितीश कुमारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पण नितीश कुमार नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. अजूनही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदी