शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Political Updates: बिहारमध्ये भाजपा युतीचं सरकार कोसळणार?; मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले, JDU आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:47 IST

जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

पटना – बिहारमध्ये सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून असलेले विधानसा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना घटनाबाह्य सभागृहाचं कामकाज चालवत असल्याचा आरोप केला. नितीश कुमार यांनी सदनातच आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या जेडीयू पक्षाच्या आमदारांनीही भाजपाविरोधात उघडपणे भाष्य केले.

जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. जेडीयूचे प्रवक्ते जाहीरपणे भाजपाविरोधात भाष्य करत आहेत. सोशल मीडियावरही दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात हल्लाबोल करत आहेत. जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी भाजपाला इशारा देताना म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या विजयामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास आला आहे. तो योग्य नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच काठी इतकीही वाकवू नका जेणेकरून ती मोडेल. कारण ही काठी मोडली तर तुटेल आणि सगळं काही संपेल. त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. इतक्यावरच जेडीयू प्रवक्ते थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, आत्मविश्वास चांगला आहे परंतु अतिआत्मविश्वास विनाशाचं कारण बनतो. भाजपानं त्यांची रणनीती बदलली नाही तर जेडीयू आणि भाजपा आघाडी जास्त दिवस टिकणार नाही असा इशाराच जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी दिला आहे.

विधानसभेत काय घडलं?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर मंगळवारी विधानसभा सभागृह सुरु झाल्यानंतरही अध्यक्ष विजय कुमार सिन्हा स्वत: आले नाहीत. सदनाची कार्यवाही करण्यासाठी भाजपा आमदार प्रेम कुमार तालिका अध्यक्षपदावर बसले. सभागृह सुरू झाल्यानंतर आरजेडी आमदारांनी मुख्यमंत्रीविरुद्ध विधानसभा अध्यक्ष मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. तेव्हा संसदीय कार्यमंत्री विजय चौधरी यांनी लोकप्रतिनिधी आणि कार्यकारी मंडळ यांची जबाबदारी वेगळी आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करायला हवा. विधानसभा अध्यक्षही घटनेला धरून कामकाज चालवत आहेत. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांच्यात विरोधाभास नाही. विधानसभा अध्यक्ष पद सर्वोच्च आहे. सदन नियमाप्रमाणे चालावे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दोन्ही घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्ती एकच बोलत आहेत असं सांगत सावरण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार