शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भाजपासाठी धोक्याची घंटा?; बिहारमध्ये पुढील २४ तास महत्त्वाचे, नितीश कुमारांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:53 IST

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे.

पटना - बिहारच्या राजकारणासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या चर्चेमुळे सर्वच पक्षाने स्वत:ची रणनीती बनवली आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांसाठी बैठक बोलावली आहे. तर आरजेडीनेही आमदार-खासदारांना बैठकीसाठी बोलावलं आहे. काँग्रेसनंही त्यांच्या आमदारांना पटनात राहण्यास सांगितले आहे. तर जीतन राम मांझी यांनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. 

बिहारच्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. नितीश कुमार भाजपाशी युती तोडू शकतात आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांना सोबत घेत नवीन सरकारची स्थापना करू शकतात असं बोललं जात आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एनडीएसाठी संकट उभं राहिले आहे. ज्याप्रकारे नितीश कुमार यांनी भाजपाशी अंतर ठेवले आहे ते पाहता नितीश कुमार काहीतरी मोठं पाऊल उचलणार असल्याचं बोलले जात आहे. नितीश कुमारांचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे. ११ ऑगस्टपर्यंत या दोन्ही नेत्यांची भेट होण्याचीही शक्यता आहे. परंतु अद्याप याला पुष्टी मिळाली नाही. 

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे. भाजपानं सध्या वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राजकीय घडामोडीत एनडीए सरकार व्यवस्थित सुरु आहे. सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. २०१४ लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभेसाठी तयारीला लागा असं भाजपा आमदारांना कळवण्यात आलं आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल असं भाजपानं म्हटलं आहे. 

नितीश कुमारांना बनायचंय पंतप्रधान?राज्यात भाजपासोबत युती तुटली नाही तरीही जेडीयू नेते नितीश कुमार पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असा दावा करत आहेत. जेडीयूचे महासचिव अली अशरफ फातमी यांनी म्हटलंय की, देशाच्या पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांच्यापेक्षा मोठा नेता कुणी नाही. तर दुसरीकडे वीआयपी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री मुकेश सहानी यांनी नितीश कुमार जर महाआघाडीत सहभागी झाले तर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी जाणार नाहीत. जेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जाईल तेव्हाच जातील असं सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा