शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

Bihar Political Update: बिहारमध्ये आज निवडणूक झाल्यास भाजपाचा उडणार धुव्वा, महाआघाडी मारेल बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 23:59 IST

Bihar Political Update: बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज तक आणि सी-वोटर यांनी केलेल्या सर्वेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी मोठ्या शिताफीने सत्तांतर घडवून आणत बिहारच्या राजकारणात भाजपाला राजकीय वनवासात पाठवले आहे. तर पुन्हा एकदा आरजेडीसोबत आघाडी करत महाआघाडीला भक्कम केलं आहे. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज तक आणि सी-वोटर यांनी केलेल्या सर्वेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेनुसार बिहारमध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची दाणादाण उडणार असून, महाआघाडी जोरदार मुसंडी मारणार आहे.

या सर्व्हेमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये एनडीएला प्रचंड मतदान झाले होते. भाजपा आणि एनडीएला तब्बल ५४ टक्के मते मिळाली होती. मात्र २०२२ च्या ऑगस्टमध्ये हा आकडा घटून ४१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तीन वर्षांत एनडीएचं १३ टक्के मतांचं नुकसान झालं आहे. तर एनडीएला झालेल्या नुकसानाचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्के मतं मिळाली होती.

मात्र आता बदललेल्या समीकरणांचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला ४६ टक्के मते मिळतील. म्हणजेच सुमारे १५-१६ टक्के अधिकची मतं महाआघाडीला मिळतील. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत ३९ जागा जिंकणाऱ्या एनडीएला आता लोकसभा निवडणूक झाल्यास केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला तब्बल २६ जागा मिळू शकतात.

दरम्यान, बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठीही मतदारांनी धक्कादायक पसंती नोंदवली आहे. बिहारमधील तब्बल ४३ टक्के मतदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर २४ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर १९ टक्के मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पसंती दिली आहे.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव