शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Political Crisis: नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री; बिहारमध्ये सत्तांतर अटळ..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:32 IST

Bihar Political Crisis: बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषा ठरली असून फक्त औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही तेजस्वी यांच्याकडे जाणार आहे.

Bihar Political Crisis:बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे. चर्चेत बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषाही निश्चित करण्यात आली आहे. सध्या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांमध्येच ही चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास सहमती दर्शवली आहे. तर, ते स्वतः उपमुख्यमंत्रिपदासह आणि गृहखातं स्वतःकडे ठेवणार आहेत. यासोबतच सभागृहात राजदचा स्पीकर असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तेजस्वी यादव यांच्याकडेच सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, लालूप्रसाद यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला जात आहे. राजदचे इतर बडे नेते अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवून आहेत पण त्यांना बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीपासून दूर ठेवले जात आहे. आरजेडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार झाले आहेत. तसेच, ते स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील, पण नितीश कुमार यांना गृहखाते तेजस्वीकडे सोपवावे लागणार आहे.

नितीश कुमारांचे भाजपपासून अंतर नितीश कुमार नेहमीच गृहखाते आपल्याकडे ठेवत असतात, पण यावेळी सरकार स्थापनेच्या अटींमध्ये तेजस्वी यादवच गृहखाते सांभाळतील. इतकंच नाही तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सभापतीपद आरजेडीच्या वाट्याला जाईल. साहजिकच, मुख्यमंत्रिपद देण्याच्या बदल्यात, नवीन सरकारमधील आपली भागीदारी महत्त्वाची राहावी म्हणून राजद दोन मोठी पदे आपल्या बाजूला ठेवत आहे. विशेष म्हणजे, नितीश यांनी फक्त काही ठराविक मुद्द्यांवरच नव्हे तर अनेक प्रसंगी भाजपपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. सुमारे महिनाभरापूर्वी नितीश कुमार यांनी पन्नास मिनिटांहून अधिक काळ जात जनगणनेच्या मुद्द्यावर तेजस्वी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार यांच्याबाबतचा सूर बदलताना दिसू लागला.

जेडीयू भाजपपासून दुरावलेजात जनगणना हे एकमेव हत्यार आहे, ज्याच्या मदतीने जेडीयू आणि आरजेडी आगामी काळात भाजपला घेरण्याचा प्रयत्न करतील. जेडीयू अनेक प्रसंगी भाजपपासून दूर राहण्याचे प्रयत्न करत आहे. अग्निवीरच्या मुद्द्यावरून जेडीयूने आरजेडीच्या विध्वंस कार्यक्रमाला उशीर रोखले आणि केंद्र सरकारकडे अग्निवीर योजनेचा आढावा घेण्याची मागणी केली. इतकेच नाही तर लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर नितीश कुमार यांचा सूर वेगळा ऐकायला मिळाला. काल म्हणजेच रविवारी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह यांनी महागाईवर केंद्र सरकारच्या विरोधात भाष्य केले होते. त्यामुळेच आगामी काळात जेडीयूचा राजकीय मार्ग वेगळा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा