शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दोन दिवसांपासून उड्डाण पुलाच्या पिलरमध्ये अडकलेल्या त्या बालकाचा अखेर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 21:14 IST

11 वर्षीय रंजनला वाचवण्यासाठी 24 तासांपासून बचावकार्य सुरू होते.

रोहतास:बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. उड्डाणपुलाच्या खांबांमध्ये अडकलेल्या 11 वर्षीय रंजनचा मृत्यू झाला आहे. खांबांमधून बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाला बाहेर काढण्यासाठी NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमचे 24 तासांपासून बचावकार्य सुरू होते. अखेर रोडचा स्लॅब बुलडोझरच्या सहाय्याने तोडून मुलाला बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

सविस्तर माहिती अशी की, नसरीगंज दौडनगर येथील 11 वर्षीय रंजन बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता. मुलगा घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान पुलाजवळून एका महिलेला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर महिलेने मुलाबाबत नातेवाईकांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलाला खांबांत अडकलेले पाहिले. यानंतर एनडीआरएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. 

पुलाचा खांब खूप जाड असल्यामुळे तो तोडणे अशक्य होते. शेवटी रोडचा स्लॅब काढण्यात आला. ही सर्व कामे पुलाशी संबंधित तज्ज्ञ पथकाच्या देखरेखीखाली झाली. बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बचावकार्य सुरू होते. एनडीआरएफच्या टीमने रंजनला ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने ऑक्सिजन दिले. त्याला शेवटी बाहेर काढले असता तो मृत आढळला.  8 ते 10 तासांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलाला मृत येथे आणण्यात आले. तर दुसरीकडे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय रडून आक्रोश करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यूPoliceपोलिस