शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 12:40 IST

कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.

बिहारच्या गोपालगंजमध्ये प्रेम विवाह करणाऱ्या एका कपलने हनीमूनच्या रात्रीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीनंतर मधुचंद्राच्या रात्रीच या जोडप्याने विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर स्थितीत नवदाम्पत्याला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथून त्यांना गोरखपूरला रेफर करण्यात आलं. या घटनेमुळे दोघांचेही कुटुंबीय धक्क्यात आहेत.

कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.  

लग्नानंतर रविवारी घरी जेवणाचा कार्यक्रमही होता. जेवणाच्या कार्यक्रमानंतर पती-पत्नी दोघेही झोपण्यासाठी निघून गेले. मात्र, त्यांनी त्यावेळीच विष खाल्लं. सदर हॉस्पिटलमध्ये प्रेमी जोडप्याला घेऊन आलेल्या कुटुंबीयांनी सांगितलं की, दोघांनी चिकनमध्ये विष मिक्स करून खाल्लं होतं. (हे पण वाचा : बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं)

दोघांनीही विष का खाल्लं याचं कारण कुणालाच माहीत नाही. असं सांगितलं जात आहे की, रूममध्ये दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. ज्यानंतर त्यांना कसंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. रात्री दोघांवरही इमरजन्सी वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय चांगल्या उपचारासाठी दोघांनाही घेऊन फरार झाले.

डॉक्टरांनुसार, कपलने विष खाल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उलटी यावी म्हणून सर्फचं पाणी पाजलं होतं. त्यानंतरही त्यांची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. याप्रकरणी पोलीस अधिकारी बीएन राय म्हणाले की, प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोघेही बेशुद्ध असल्याने चौकशी करता आली नाही. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न