शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:42 IST

Jitan Ram Manjhi : नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले.

वैशाली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहार हे मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना होत असतात, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे.  दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलीस-प्रशासन काय कारवाई करते, हा प्रश्न आहे. दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या या विधानावरून सध्या गदारोळ होण्याची शक्यता आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले. विरोधकांच्या आरोपांबाबत जीतनराम मांझी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "काहीही बोलता येते. बिहारमध्ये एक-दोन कोटी लोक राहत नाहीत. बिहारची लोकसंख्या 12 कोटी आहे. येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डावही असू शकतो." 

वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने सरकारला जंगलराज आणि गुंडाराज म्हटले आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले होते. तसेच, मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमार