शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:42 IST

Jitan Ram Manjhi : नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले.

वैशाली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहार हे मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना होत असतात, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे.  दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलीस-प्रशासन काय कारवाई करते, हा प्रश्न आहे. दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या या विधानावरून सध्या गदारोळ होण्याची शक्यता आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले. विरोधकांच्या आरोपांबाबत जीतनराम मांझी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "काहीही बोलता येते. बिहारमध्ये एक-दोन कोटी लोक राहत नाहीत. बिहारची लोकसंख्या 12 कोटी आहे. येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डावही असू शकतो." 

वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने सरकारला जंगलराज आणि गुंडाराज म्हटले आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले होते. तसेच, मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमार