शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:42 IST

Jitan Ram Manjhi : नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले.

वैशाली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहार हे मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना होत असतात, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे.  दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलीस-प्रशासन काय कारवाई करते, हा प्रश्न आहे. दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या या विधानावरून सध्या गदारोळ होण्याची शक्यता आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले. विरोधकांच्या आरोपांबाबत जीतनराम मांझी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "काहीही बोलता येते. बिहारमध्ये एक-दोन कोटी लोक राहत नाहीत. बिहारची लोकसंख्या 12 कोटी आहे. येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डावही असू शकतो." 

वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने सरकारला जंगलराज आणि गुंडाराज म्हटले आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले होते. तसेच, मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमार