शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
4
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
5
बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
6
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
7
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
8
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
9
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
10
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
11
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
12
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
13
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
14
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
15
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
16
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
17
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
18
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
19
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
20
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:24 IST

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

पाटणा: बिहारच्या छपरा जिल्ह्यात बनावट/विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, आतापर्यंत 47 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजब विधान करून सर्वांनाच चकीत केले आहे. गुरुवारी विधानसभेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ''जो दारू पितो तो नक्कीच मरतो. बिहारमध्ये बनावट दारूमुळे मृत्यू होणे ही नवीन गोष्ट नाही. देशभरातील लोक बनावट दारूमुळे मरतात. विरोधक केवळ दारूच्या मुद्यावर राजकारण करत आहेत. बिहारमध्ये दारूबंदी नसतानाही इतर राज्यात लोक मरायचे. लोकांनी स्वतः सावध राहावे. दारू वाईट आहे आणि त्याचे सेवन करू नये.''

दारूबंदीचा अनेकांना फायदा झालासीएम नितीश कुमार पुढे म्हणाले की, ''दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारू सोडली, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. मी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहे की, दोषींना पकडावे, गरिबांना पकडू नये. दारू बनवणाऱ्या आणि दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करावी.''

दारू सोडणाऱ्यांना एक लाख रुपये देणार मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''गेल्या वेळी जेव्हा बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाला होता तेव्हा कोणीतरी त्यांना नुकसान भरपाई द्या, असे म्हटले होते. भरपाई कशासाठी? जर एखादा दारू प्यायला, तर तो मरेलच. उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यावर शोक व्यक्त करायला हवा, त्या ठिकाणांना भेटी देऊन लोकांना समजावून सांगायला हवे. आमचे सरकार लोकांना दुसरे काम सुरू करण्यासाठी एक लाख रुपये देण्यास तयार'' असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता जागृत होत नाहीदारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ''हे बिहारचे दुर्दैव आहे. बिहारमध्ये दारू धोरण लागू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण मुख्यमंत्र्यांची सहानुभूती जागृत होत नाही आणि कुणी सभागृहात आवाज उठवला की, कुणालाही अपेक्षित नव्हते, अशी वागणूक दिली जाते.'' यासोबतच माजी राज्यसभा खासदार आरसीपी सिंह म्हणाले की, ''नितीश कुमार देशाचे पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर बिहारचा बळी देत ​​आहेत. 2020 नंतर नितीश कुमार केवळ विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.''

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारliquor banदारूबंदीBiharबिहार