शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सरकार प्रवाशांना 'कंडोम' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 14:03 IST

बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पाटणा - कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकार झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हे कोरोनाचं हॉटस्पॉट राज्य ठरलं असून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यात, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक संख्येने मजूर जातना दिसत आहेत. त्यामुळेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. आता, बिहार सरकारने एक मजेशीर निर्णय घेतला आहे. कुटुंब नियोजन योजनेच्या जनजागृतीसाठी क्वारंटाईन सेंटरमधील प्रवाशांना कंडोम देण्यात येणार आहे. 

बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, संबंधित प्रवाशांना कुटुंब नियोजनाचे महत्व अन् माहिती देऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. डोअर टू डोअर आरोग्य तपासणीवेळी पोलिओच्या सुपरवायझरकडून १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस कंडोम देण्यात येणार आहे. नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, केअर इंडिया कुटुंब नियोजन समन्वयक अमित कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पोलिओ अभियानासाठी संबंधित सुपरवायझरांना याचे ट्रेनिंग देण्यात आले असून कंडोमचे बॉक्सही दिले आहेत. घर-घर तपासणीवेळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस हे कंडोम देण्यात येणार आहे. 

दरम्यान, सध्या घरवापसी करणाऱ्या प्रवाशांना गावाकडे क्वारंटाईन करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रवासी क्वारंटाईन झाले असून या सर्वांची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यातून, कुटुंब नियोजन जनजागृतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणMumbaiमुंबईHealthआरोग्य