शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सरकार प्रवाशांना 'कंडोम' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 14:03 IST

बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पाटणा - कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकार झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हे कोरोनाचं हॉटस्पॉट राज्य ठरलं असून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यात, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अधिक संख्येने मजूर जातना दिसत आहेत. त्यामुळेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. आता, बिहार सरकारने एक मजेशीर निर्णय घेतला आहे. कुटुंब नियोजन योजनेच्या जनजागृतीसाठी क्वारंटाईन सेंटरमधील प्रवाशांना कंडोम देण्यात येणार आहे. 

बिहारमधील आरोग्य विभागाने पुढाकार घेत, क्वारंटाईन अवधी पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना कंडोम वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, संबंधित प्रवाशांना कुटुंब नियोजनाचे महत्व अन् माहिती देऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. डोअर टू डोअर आरोग्य तपासणीवेळी पोलिओच्या सुपरवायझरकडून १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस कंडोम देण्यात येणार आहे. नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, केअर इंडिया कुटुंब नियोजन समन्वयक अमित कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पोलिओ अभियानासाठी संबंधित सुपरवायझरांना याचे ट्रेनिंग देण्यात आले असून कंडोमचे बॉक्सही दिले आहेत. घर-घर तपासणीवेळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणाऱ्यांस हे कंडोम देण्यात येणार आहे. 

दरम्यान, सध्या घरवापसी करणाऱ्या प्रवाशांना गावाकडे क्वारंटाईन करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्रवासी क्वारंटाईन झाले असून या सर्वांची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यातून, कुटुंब नियोजन जनजागृतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणMumbaiमुंबईHealthआरोग्य