शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'या' राज्य सरकारने सप्टेंबरमध्येही वाढवला लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:47 IST

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

ठळक मुद्देराज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

पाटणा - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा देशात सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, त्यामुळे उद्योग-व्यवहार आणि जनतेला थोडी मोकळीक दिली असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले नाहीत. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे कधी उठणार असा प्रश्न लोकांना पडत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले असून 30 ऑगस्टपर्यंत देशात शिथिलतेचं लॉकडाऊन आहे. मात्र, आता बिहार सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता. त्यानुसार, 30 ऑगस्टपर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. आता, बिहार सरकारने केंद्र सकारच्या या लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी 6 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. 

दरम्यान, राज्याला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. उलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार