शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'या' राज्य सरकारने सप्टेंबरमध्येही वाढवला लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:47 IST

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

ठळक मुद्देराज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

पाटणा - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा देशात सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, त्यामुळे उद्योग-व्यवहार आणि जनतेला थोडी मोकळीक दिली असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले नाहीत. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे कधी उठणार असा प्रश्न लोकांना पडत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले असून 30 ऑगस्टपर्यंत देशात शिथिलतेचं लॉकडाऊन आहे. मात्र, आता बिहार सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता. त्यानुसार, 30 ऑगस्टपर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. आता, बिहार सरकारने केंद्र सकारच्या या लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी 6 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. 

दरम्यान, राज्याला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. उलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार