शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 'या' राज्य सरकारने सप्टेंबरमध्येही वाढवला लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:47 IST

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

ठळक मुद्देराज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता.

पाटणा - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा देशात सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, त्यामुळे उद्योग-व्यवहार आणि जनतेला थोडी मोकळीक दिली असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले नाहीत. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे कधी उठणार असा प्रश्न लोकांना पडत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले असून 30 ऑगस्टपर्यंत देशात शिथिलतेचं लॉकडाऊन आहे. मात्र, आता बिहार सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बिहार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील लॉकडाऊन 6 सप्टेंबरपर्यं वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 29 जुलै रोजी लॉकडाऊन संदर्भातील आदेश जारी केला होता. त्यानुसार, 30 ऑगस्टपर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. आता, बिहार सरकारने केंद्र सकारच्या या लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी 6 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. 

दरम्यान, राज्याला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. उलट ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार