शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Bihar Floor Test: बिहार विधानसभेत वेगळाच ड्रामा; अध्यक्ष जाता जाता नितिशकुमारांना सुनावून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:23 IST

विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतू, त्यापूर्वी त्यांनी नितीशकुमार आणि तेजस्वी यादवांना खूप काही सुनावले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांचा राडा, गोंधळाचे वातावरण सुरु असताना बिहारच्या विधानसभेत वेगळाच ड्रामा घडला आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी असताना राज्यभरात २३ हून अधिक ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. त्यातच नितीशकुमार-भाजपा सरकारकाळातील विधानसभा अध्यक्षांनी जाता जाता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच नैतिकतेचे धडे सुनावले आहेत. 

विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतू, त्यापूर्वी त्यांनी नितीशकुमार आणि तेजस्वी यादवांना खूप काही सुनावले. सरकारने ९ ऑगस्ट रोजी सत्ता सोडली. 10 ऑगस्ट रोजी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मी स्वतः सभापतीपद सोडणार होतो. पण माझ्या विरोधात सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आल्याचे मला ९ ऑगस्टलाच समजले. अविश्वास ठरावावर काम होणे माझी नैतिक जबाबदारी होती. तुम्ही मांडलेला अविश्वास प्रस्ताव अस्पष्ट आहे. 9 जणांची पत्रे मिळाली, त्यापैकी 8 जणांचे पत्र नियमानुसार दिसत नाही, असे सांगतानाच माझ्यावर मनमानीपणाचा, कामावर, हुकूमशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मला उत्तर देणे आवश्यक आहे, असे सिन्हा म्हणाले. 

बिहारमधील प्रशासकीय अराजकता हटली आहे. अराजकता निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नितीश यांनीच अंकुश लावला आहे, असा टोला सिन्हा यांनी लगावला. आज माझ्यावर कोणताही खटला किंवा फौजदारी खटला नाही. आज सभागृहात असे अनेक आमदार आहेत, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, त्यांना वाचवण्याची जबाबदारी सभागृहावर आहे. तुम्ही विश्वासदर्शक ठराव गमावला, असे मंत्री ललित यांनी लिहिले, ते मला योग्य वाटले. माझ्या 20 महिन्यांच्या कार्यकाळात 100 टक्के उत्तरे मिळाली, विरोधी पक्षातील सदस्यांना पाठिंबा दिला, सभागृहाचे कामकाज इंटरनेटवरून थेट चालवण्याचे काम केले, यामुळे या आमदारांच्या तक्रारी चुकीच्या आहेत, असे सिन्हा म्हणाले. 

सार्वजनिक सुटीच्या दिवशी माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला हे चुकीचे झाले असे सिन्हा म्हणाले. या जागेवर अविश्वास दाखवून तुम्ही सर्वांना काय संदेश देणार होतात, हे आता जनता ठरवेल. मी २० वर्षांत सभागृहाची शानच वाढविली, असेही सिन्हा यांनी म्हटले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा