शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Bihar Floor Test: बिहार विधानसभेत वेगळाच ड्रामा; अध्यक्ष जाता जाता नितिशकुमारांना सुनावून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:23 IST

विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतू, त्यापूर्वी त्यांनी नितीशकुमार आणि तेजस्वी यादवांना खूप काही सुनावले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांचा राडा, गोंधळाचे वातावरण सुरु असताना बिहारच्या विधानसभेत वेगळाच ड्रामा घडला आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी असताना राज्यभरात २३ हून अधिक ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. त्यातच नितीशकुमार-भाजपा सरकारकाळातील विधानसभा अध्यक्षांनी जाता जाता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच नैतिकतेचे धडे सुनावले आहेत. 

विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतू, त्यापूर्वी त्यांनी नितीशकुमार आणि तेजस्वी यादवांना खूप काही सुनावले. सरकारने ९ ऑगस्ट रोजी सत्ता सोडली. 10 ऑगस्ट रोजी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मी स्वतः सभापतीपद सोडणार होतो. पण माझ्या विरोधात सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आल्याचे मला ९ ऑगस्टलाच समजले. अविश्वास ठरावावर काम होणे माझी नैतिक जबाबदारी होती. तुम्ही मांडलेला अविश्वास प्रस्ताव अस्पष्ट आहे. 9 जणांची पत्रे मिळाली, त्यापैकी 8 जणांचे पत्र नियमानुसार दिसत नाही, असे सांगतानाच माझ्यावर मनमानीपणाचा, कामावर, हुकूमशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मला उत्तर देणे आवश्यक आहे, असे सिन्हा म्हणाले. 

बिहारमधील प्रशासकीय अराजकता हटली आहे. अराजकता निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नितीश यांनीच अंकुश लावला आहे, असा टोला सिन्हा यांनी लगावला. आज माझ्यावर कोणताही खटला किंवा फौजदारी खटला नाही. आज सभागृहात असे अनेक आमदार आहेत, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, त्यांना वाचवण्याची जबाबदारी सभागृहावर आहे. तुम्ही विश्वासदर्शक ठराव गमावला, असे मंत्री ललित यांनी लिहिले, ते मला योग्य वाटले. माझ्या 20 महिन्यांच्या कार्यकाळात 100 टक्के उत्तरे मिळाली, विरोधी पक्षातील सदस्यांना पाठिंबा दिला, सभागृहाचे कामकाज इंटरनेटवरून थेट चालवण्याचे काम केले, यामुळे या आमदारांच्या तक्रारी चुकीच्या आहेत, असे सिन्हा म्हणाले. 

सार्वजनिक सुटीच्या दिवशी माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला हे चुकीचे झाले असे सिन्हा म्हणाले. या जागेवर अविश्वास दाखवून तुम्ही सर्वांना काय संदेश देणार होतात, हे आता जनता ठरवेल. मी २० वर्षांत सभागृहाची शानच वाढविली, असेही सिन्हा यांनी म्हटले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा