शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांमुळे भाजपाचे गणित बिघडले; अधिक जागा जिंकण्यासाठी रणनीतीत बदलाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 07:56 IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएने बिहारमधील ४० पैकी ३९ लोकसभा जागा जिंकल्या होत्या.

- हरीश गुुप्ता

नवी दिल्ली : जनता दल (यू)चे प्रमुख व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजदसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केल्यामुळे भाजप कोंडीत सापडला आहे. बिहार हे भाजपसाठी अतिशय महत्त्वाचे राज्य असून, २०२४च्या लोकसभा निवडणुकांत तिथे कशा रीतीने अधिकाधिक जागा जिंकता येतील याची चिंता आता भाजपला लागली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीएने बिहारमधील ४० पैकी ३९ लोकसभा जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपला १७, जनता दल (यू)ला १६, लोक जनशक्ती पक्षाला (लोजप)  ६ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकांत एनडीएला ५३.२५ टक्के मते मिळाली होती. २०१४ ला मोदींच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला होता. त्यावेळी बिहारमध्ये भाजपला २९.४० टक्के मते मिळाली होती व २२ जागा जिंकल्या होत्या. लोजप व राष्ट्रीय लोक समता पक्षाला (रालोसप) ९ जागा व ९.४० टक्के मते मिळाली होती.

राजद-काँग्रेस, जनता दल (यू) यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढविल्या होत्या. त्यांना ४४.५० टक्के मते मिळाली होती. हे चित्र पाहता भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकांत ३० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. अनेक पक्ष हे नितीशकुमार यांच्यासोबत असतील असे चित्र आहे. त्यामुळे बिहारबाबत भाजप आता नव्याने रणनीती आखण्याची शक्यता आहे. 

इतर पक्षांच्या नेत्यांना घेणार भाजपमध्ये 

बिहारमधील बदललेली राजकीय स्थिती पाहता त्या राज्यातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची पाटणा येथे मंगळवारी रात्री एक बैठक झाली. बिहारमधील इतर पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले जाण्याची शक्यता आहे. बिहारमधील जनता दल (यू)चे नेते रामचंद्रप्रसाद सिंह यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी नितीशकुमार यांनी दिली नाही. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांनीही भाजपमध्ये यावे असेही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.  

अध्यक्षांविरोधात मांडणार अविश्वास प्रस्ताव

बिहारमध्ये नव्याने अस्तित्त्वात आलेल्या महाआघाडी सरकारने बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे. सिन्हा हे भाजप नेते आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळेसच नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रीय जनता दलाला (राजद) दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने देखील या पदावर दावा केला आहे. 

राष्ट्रीय राजकारणाशी संंबंध नाही : प्रशांत किशोर

बिहारमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी या त्या राज्यापुरत्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची पर्यायी आघाडी निर्माण होण्याशी काहीही संबंध नाही, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. तेजस्वी यादव हे नव्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रशांत किशोर म्हणाले.

गृह मंत्रालयावरून पेच

बिहारमध्ये नवीन सरकारचे गठन तर झाले. परंतु गृह मंत्रालयावरून अद्यापही पेच कायम आहे. तेजस्वी यादव यांना गृह मंत्रालय पाहिजे, तर या सरकारमध्येही मुख्यमंत्री नितीशकुमार गृह खाते त्यांच्याकडेच ठेवू इच्छित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे गृह मंत्रालय तेजस्वी यांना देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. नवीन सरकारच्या मंत्री परिषदेच्या सूत्रानुसार, जी खाती पूर्वी भाजपकडे होती, ती राजद, काँग्रेस व हम यांच्यात विभागली जाणार आहेत. जी खाती पूर्वीपासून जदयूकडे होती, ती जदयूकडेच राहणार आहेत. असे झाले तर गृह, वित्त, शिक्षण यांसारखी महत्त्वाची खाती जदयूकडेच राहतील. आमदारांच्या संख्येनुसार राजदला सर्वांत जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राजद बिहारमधील सर्वांत मोठा पक्ष आहे. तेजस्वी यादव मंत्र्यांच्या नावांबाबत विचारविनिमय करीत आहेत. नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार