शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी निर्णयाचा किती लोकांना फायदा झाला? -नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 13:28 IST

कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत

पाटणा - कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. नोटाबंदी निर्णयाचे पुरेपुर समर्थन करणाऱ्या नितीश कुमार यांनी नोटाबंदी निर्णयाच्या अपयशास बँकांना जबाबदार ठरवलं आहे.  बँकांच्या भूमिकेमुळे नोटाबंदी निर्णयाचा योग्य लाभ जनतेला मिळाला नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

नितीश कुमार पुढे असंही म्हणाले की, सुरुवातीला मी नोटाबंदी निर्णयाचं समर्थन करत होतो, पण या निर्णयामुळे किती जणांना फायदा झाला?. लोकांनी आपल्याकडील पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे जमा केले. देशाच्या प्रगतीमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असते. बँकांचं काम फक्त ठेवी आणि कर्ज देणे इतकंच नाही. तर विविध योजना राबवण्यात बँकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे,' असे नितीश कुमार म्हणाले. 

यावेळी त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचेही म्हटले.  'सर्वसामान्य लोकांना कर्ज देताना बँका कठोर भूमिकेत असतात. मात्र जे धनाढ्य कर्ज बुडवून पसार होतात त्यांचं काय? आश्चर्यकारक बाब म्हणजे  बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात कसे येत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ''बँकिंग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, मी टीका करत नाहीय, फक्त मत व्यक्त करत आहे.देशात विकासासाठी सरकार ज्या निधीची तरतूद करते, त्याच्या योग्यरित्या वाटप करण्यासाठी बँकांना आपली यंत्रणा मजबूत करणं आवश्यक आहे'', असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी