शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

मला इच्छामरण द्या; 15 वर्षाच्या मुलाने केली राष्ट्रपतींना पत्र लिहून मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 9:28 AM

माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही

ठळक मुद्दे15 वर्षाच्या मुलाने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहेकौंटुबिक कलहाला कंटाळून मुलाने मागितली परवानगी पंतप्रधान कार्यालयाने दिले जिल्हा प्रशासनला चौकशीचे आदेश

भागलपूर - बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने कौटुंबिक कलहाला कंटाळून इच्छामरणाची मागणी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या विद्यार्थ्याने इच्छा मरणाची मागणी केली आहे. राष्ट्रपतींकडून हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलं आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. सरकारी सूत्रांनुसार मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.

भागपूर जिल्ह्यातील कहलगाव ठाणे अंतर्गत असणाऱ्या महिषामुंडा गावातील रहिवाशी मनोज कुमार मित्रा यांच्या 15 वर्षीय मुलाने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. कृष कुमार मित्रा असं या मुलाचं नाव आहे. कृषने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्याचसोबत कृषने पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविलं होतं. 

कृष मित्राने पत्रात लिहिलं आहे की, माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. तर माझे वडील कॅन्सर पीडित आहेत. ते सध्या ग्रामीण विकास विभागात जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई सुजाता इंडियन ओवरसीज बँक पटणा येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहे.

कृष हा त्याचे वडील मनोज कुमार मित्रा यांच्यासोबत राहतो. तो सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. मनोज आणि त्यांची पत्नी सुजाता यांच्यात अनेक वर्षापासून वादविवाद सुरु आहेत. त्यांच्या भांडणामुळे हे दोघंही वेगळे राहतात. कृषच्या घरच्यांना सुजाताचं वागणं पटत नाही त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. या सगळ्या कौटुंबिक कलहामुळे माझी जगण्याची इच्छा नाही असं कृषने सांगितले आहे. त्यामुळे आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधानांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधानEuthanasiaइच्छामरण