शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
5
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
6
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
7
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
8
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
9
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
10
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
11
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
12
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
13
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
15
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
16
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
18
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
19
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:44 IST

कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. 

गोपालगंज - बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. मात्र उमेदवारी तिकीट वाटपावरून प्रत्येक पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात गोपालगंज सदरच्या आमदार कुसुम देवी यांचं तिकीट कापण्यात आलं. कुसुम देवी यांच्याऐवजी भाजपाने जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष सिंह यांना गोपालगंज सदर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली.

पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर गोपालगंजच्या विद्यमान आमदार कुसुम देवी यांना भावना अनावर झाल्या. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यावेळी कुसुम देवी ढसाढसा रडल्या. आईचे अश्रू पाहून मुलगा अनिकेत सिंह यालाही स्वत:ला सावरता आले नाही, त्याचेही डोळे पाण्याने भरले. पक्षावर विश्वासघाताचा आरोप करत कुसुम देवी म्हणाल्या की, आम्ही मागील २० वर्षापासून भाजपात एकनिष्ठ राहिलो. पक्षाची सेवा केली, जेव्हा पक्षाला गरज होती, तेव्हाही जनतेत जाऊन काम केले. पक्षाने आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा असं सांगितले होते. परंतु माध्यमातून माझी उमेदवारी नाकारली हे कळले. एकीकडे महिला सशक्तीकरणावर बोलायचे आणि दुसरीकडे माझ्यासारख्या महिलेवर अन्याय करायचा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच माझी चूक काय होती हे पक्षाने सांगावे असा प्रश्न कुसुम देवी यांनी पक्षाला विचारला, तर आमदाराचा मुलगा अनिकेत सिंह यानेही उघडपणे पक्षाच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली. पक्षाला आता कार्यकर्त्यांची गरज नाही. पैशाचे राजकारण सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष आणि काही नेते तिकिटाचा व्यवसाय करतात. त्यामुळे जनताच आता भाजपाला धडा शिकवेल असा आरोप त्याने केला. कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. 

दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कुसुम देवी भाजपात बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जाते. समर्थकांकडून त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह होत आहे. जर कुसुम देवी यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर गोपालगंज आणि बैकुंठपूर या दोन्ही मतदारसंघातील गणित बदलू शकते. भाजपातील अंतर्गत नाराजी पाहता तिकीट वाटपावरून पक्षातच बंडखोरीने वरिष्ठांची डोकेदुखी वाढवली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५