शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 09:10 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत घडलेल्या घडामोडींची आता दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसला तर केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत घडलेल्या घडामोडींची आता दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लढवलेल्या ६१ जागांपैकी केवळ ६ जागांवरच विजय मिळवता आला होता. या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे राजीनामा घेऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे गेले होते. मात्र खर्गे यांनी त्यांना हा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे देण्यास सांगितले. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर घडलेल्या घडामोडी ह्या काँग्रेसला संघटनात्मक दृष्टीने अधिकच चिंतेत टाकणाऱ्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आढावा बैठकीला सुरुवात केल्यावर राहुल गांधी यांनी बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांना बिहारमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदारांनाआत बोलावण्यास सांगितले. त्यावर अल्लावरू हळू आवाजात म्हणाले की,’सर आपले सहाच आमदार जिंकले आहेत आणि ते इथेच उपस्थित आहेत’. हा संवाद ऐकून तिथे उपस्थित असलेले इतर नेते अवाक् झाले. बिहारमध्ये महाआघाडीतील घटकपक्ष म्हणून लढत असलेल्या काँग्रेसला केवळ सहा जागांवरच विजय मिळवता आला याची कदाचित राहुल गांधी यांना कल्पना नसावी.

दरम्यान, या बैठकीमध्ये पुढे जे काही घडलं ते अधिकच धक्कादायक होतं. आढावा बैठकीत काँग्रेसची कामगिरी २०१० च्या तुलनेत अधिक चांगली झाल्याचे सांगण्यात आले. २०१०मध्ये पक्षाने केवळ ४ जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी सहा जागा जिंकल्या. म्हणजे पक्षाची कामगिरी आधीच्या तुलनेच समाधानकारक झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र काँग्रेसच्या बैठकीत घडलेल्या या घडामोडी आता चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Only six? Rahul Gandhi questions Bihar loss; leaders cite low wins.

Web Summary : Rahul Gandhi questioned the low number of Congress MLAs elected in Bihar. Leaders pointed out the party only won six seats, sparking internal discussions about the disappointing performance compared to previous elections.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५