शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST

बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे

नवी दिल्ली - हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर आरएसएस बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिशन त्रिशूल नावानं एक खास प्लॅन बनवला आहे. या प्लॅननुसार, ३ प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. नाराज मतदारांची ओळख, प्रभावी मुद्द्यांचा आढावा आणि भाजपासाठी फायदेशीर आणि नुकसानदायक ठरणाऱ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले जाईल. ही रणनीती हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत प्रभावी ठरल्यानंतर बिहारमध्येही वापरली जाणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये वापरण्यात येणाऱ्या रणनीतीला 'मिशन त्रिशूल' नाव देण्यात आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे या मिशन अंतर्गत ३ प्रमुख टार्गेट ठेवलं आहे. सर्व्हेतून नाराज मतदार आणि प्रमुख मुद्दे याचा आढावा घेणे, त्यानंतर कोणता मुद्दा सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरवणे, मग भाजपासाठी काय फायद्याचे आणि काय तोट्याचे आहे असे मुद्दे तपासून घेणे अशी ही रणनीती आहे.

मार्चमध्ये द्यावा लागणार ग्राऊंड रिपोर्ट

माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी RSS कुठेही कमी पडणार नाही. मिशन त्रिशूल हे त्यादिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आरएसएस स्वयंसेवकांना खास टास्क देण्यात आलं आहे. त्यांनी आपापल्या परिसरात RSS शाखेचा विस्तार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना अभियानाशी जोडण्यास सांगितले आहे. त्याशिवाय लोकांशी संपर्क साधून त्यांचे विचार जाणून घेणे, मैत्री वाढवण्याच्या सूचना आहेत. त्यातून RSS ला प्रत्यक्षात जमिनीशी जोडलेल्या लोकांचे विचार आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यास मदत होणार आहे. स्वयंसेवकांना हे काम मार्चपर्यंत पूर्ण करून त्यांचा रिपोर्ट RSS च्या विभागीय बैठकीत द्यावा लागणार आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीपूर्वी आरएसएसकडून एक स्वतंत्र सर्व्हे केला जात आहे. हा अत्यंत गोपनीय असून त्यातून ३ गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणत्या नेत्याविरोधात नाराजी आहे, कोणता मुद्दा अधिक प्रभावी ठरेल, कोणता मुद्दा भाजपाला फायदा देईल. सर्व्हेचा रिपोर्ट निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल. निवडणूक वर्षात RSS बिहारमधील शाखांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये उत्तर बिहार, दक्षिण बिहार असे २ प्रांत आहेत, मुजफ्फरपूर इथं उत्तर बिहारचं तर पटना इथं दक्षिण बिहारचं मुख्यालय आहे. बिहारमध्ये सध्या १००० ठिकाणी आरएसएसची शाखा आहे. 

दिल्लीत राबवलं होतं 'त्रिदेव'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरएसएसने बूथ पातळीवर त्रिदेव तैनात केले होते. त्रिदेवमध्ये एक पुरूष, एक महिला आणि एक युवा यांचा समावेश होता. हे त्रिदेव आपापल्या भागात लोकांशी संपर्कात होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. प्रत्येक त्रिदेव अंतर्गत कमीत कमी १० लोक काम करत होते. त्याप्रमाणे आरएसएसने मजबूत नेटवर्क तयार केले होते ज्यातून निवडणुकीत भाजपाला खूप मदत मिळाली. आता आरएसएसची ही रणनीती बिहारमध्येही वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :BiharबिहारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाdelhiदिल्लीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४