शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST

बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे

नवी दिल्ली - हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर आरएसएस बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिशन त्रिशूल नावानं एक खास प्लॅन बनवला आहे. या प्लॅननुसार, ३ प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. नाराज मतदारांची ओळख, प्रभावी मुद्द्यांचा आढावा आणि भाजपासाठी फायदेशीर आणि नुकसानदायक ठरणाऱ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले जाईल. ही रणनीती हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत प्रभावी ठरल्यानंतर बिहारमध्येही वापरली जाणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीला अजून ८ महिने कालावधी आहे. मात्र आरएसएसने आतापासून या राज्यात निवडणूक तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये वापरण्यात येणाऱ्या रणनीतीला 'मिशन त्रिशूल' नाव देण्यात आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे या मिशन अंतर्गत ३ प्रमुख टार्गेट ठेवलं आहे. सर्व्हेतून नाराज मतदार आणि प्रमुख मुद्दे याचा आढावा घेणे, त्यानंतर कोणता मुद्दा सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरवणे, मग भाजपासाठी काय फायद्याचे आणि काय तोट्याचे आहे असे मुद्दे तपासून घेणे अशी ही रणनीती आहे.

मार्चमध्ये द्यावा लागणार ग्राऊंड रिपोर्ट

माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी RSS कुठेही कमी पडणार नाही. मिशन त्रिशूल हे त्यादिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आरएसएस स्वयंसेवकांना खास टास्क देण्यात आलं आहे. त्यांनी आपापल्या परिसरात RSS शाखेचा विस्तार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना अभियानाशी जोडण्यास सांगितले आहे. त्याशिवाय लोकांशी संपर्क साधून त्यांचे विचार जाणून घेणे, मैत्री वाढवण्याच्या सूचना आहेत. त्यातून RSS ला प्रत्यक्षात जमिनीशी जोडलेल्या लोकांचे विचार आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यास मदत होणार आहे. स्वयंसेवकांना हे काम मार्चपर्यंत पूर्ण करून त्यांचा रिपोर्ट RSS च्या विभागीय बैठकीत द्यावा लागणार आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीपूर्वी आरएसएसकडून एक स्वतंत्र सर्व्हे केला जात आहे. हा अत्यंत गोपनीय असून त्यातून ३ गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणत्या नेत्याविरोधात नाराजी आहे, कोणता मुद्दा अधिक प्रभावी ठरेल, कोणता मुद्दा भाजपाला फायदा देईल. सर्व्हेचा रिपोर्ट निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल. निवडणूक वर्षात RSS बिहारमधील शाखांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये उत्तर बिहार, दक्षिण बिहार असे २ प्रांत आहेत, मुजफ्फरपूर इथं उत्तर बिहारचं तर पटना इथं दक्षिण बिहारचं मुख्यालय आहे. बिहारमध्ये सध्या १००० ठिकाणी आरएसएसची शाखा आहे. 

दिल्लीत राबवलं होतं 'त्रिदेव'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरएसएसने बूथ पातळीवर त्रिदेव तैनात केले होते. त्रिदेवमध्ये एक पुरूष, एक महिला आणि एक युवा यांचा समावेश होता. हे त्रिदेव आपापल्या भागात लोकांशी संपर्कात होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. प्रत्येक त्रिदेव अंतर्गत कमीत कमी १० लोक काम करत होते. त्याप्रमाणे आरएसएसने मजबूत नेटवर्क तयार केले होते ज्यातून निवडणुकीत भाजपाला खूप मदत मिळाली. आता आरएसएसची ही रणनीती बिहारमध्येही वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :BiharबिहारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाdelhiदिल्लीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४