शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:56 IST

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याला काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. आता या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे अशा आरोप करत काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेशात सपा, बसपानेही नोटाबंदीवरूनच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.मायावती यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदी सरकारने जनतेला दाखविलेल्या स्वप्नांपैकी एकही पूर्ण झालेले नाही. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी जनतेच्या सवालांना उत्तर देण्यासाठी ५० दिवस मागितले होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. त्यानंतर दोन वर्षे उलटली तरी मोदी या निर्णयाच्या परिणामांबद्दल तोंड उघडायला तयार नाहीत. या निर्णयामुळे देशातील बेकारी वाढली. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे.काँग्रेसने नोटाबंदीविरोधात रिझर्व्ह बँकेच्या दिल्लीतील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यात सहभागी झालेले अशोक गेहलोत, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, भूपेंद्रसिंह हुड्डा, सुष्मिता देव केशव यादव, मनीष चतरथ यांसह काही काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून संसद मार्ग ठाण्यात घेऊन गेले व काही वेळाने सुटका केली. गेहलोत यांनी निदर्शकांसमोर केलेल्या भाषणात सांगितले की, नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेवर केलेला आत्मघाती हल्ला होता. दिल्ली, लखनौ, जयपूरसह संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटाबंदीविरोधात निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढमध्ये आरोप केला की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुटबुटवाल्या उद्योगपती मित्रांच्या मदतीसाठी नोटांबंदी केली. उद्योगपतींना आपला काळा पैसा पांढरा करता यावा यासाठी हा निर्णय घेतला.सुरजेवालांनी उजेडातआणले भाजपाचे कूकर्मंस्वतंत्र भारतातील नोटाबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला. या निर्णयाबाबत सात प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे भाजपाने द्यावीत अशी मागणी त्यांनी केली होती. गुजरातमधील ज्या सहकारी बँका भाजपच्या ताब्यात आहेत त्यांना हाताशी धरून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केल्याचा आरोप सुरजेवालांनी केला होता. सहकारी बँकांची आरटीआयद्वारे मिळालेली कागदपत्रे त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ प्रसारमाध्यमांसमोर ठेवली होती. देशभरात भाजपसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहारांबाबतची कागदपत्रेही त्यांनी उजेडात आणली होती. या गैरव्यवहारांची मोदींनी चौकशी करावी अशी मागणीही सुरजेवालांनी केली होती.

टॅग्स :congressकाँग्रेस