शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:18 IST

कोल्हापूरमधील प्रसिद्ध हत्तीण 'महादेवी' गुजरातच्या जामनगर येथील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

कोल्हापूरमधील प्रसिद्ध हत्तीण 'महादेवी' गुजरातच्या जामनगर येथील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. 

सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चांदुकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्यास सहमती दर्शविली. याचिकाकर्त्याने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करत म्हटले की, "वनतारा नावाचे एक अभयारण्य आहे, त्यांनी बळजबरीने मंदिरातील हत्तीण तिकडे नेली आहे."

नेमकं प्रकरण काय?

गेल्या ३० वर्षांपासून महादेवी ही कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थाच्या ताब्यात होती. तिला जामनगरला नेल्यानंतर हजारो लोकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत.

जुलैमध्ये, जैन मंदिर ट्रस्टने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेत माधुरी अर्थात महादेवी हत्तीणीला हस्तांतरित करण्याच्या आदेशाला आव्हान दिले होते. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी म्हटले होते की, हत्तीणीचे कल्याण धार्मिक कार्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. हत्तीणीची शारीरिक स्थिती खराब असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

२८ जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर मंदिर ट्रस्टने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आणि हत्तीणीला लवकरात लवकर वनताराला पाठवण्यास सांगितले होते. मात्र, हत्तीणीला जामनगरला पाठवल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, जैन मंदिर ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि राज्य सरकारही हत्तीणीला परत आणण्यासाठी समर्थन देईल. 

टॅग्स :Vantaraवनताराkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र