शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अरविंद केजरीवालांना धक्का! काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 15:25 IST

Congress And AAP: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

Congress And AAP: केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनाही भेटले. या सर्वांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्राने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. राज्यसभेत या अध्यादेशाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांच्याकडून केले जात आहे. यासाठी अरविंद केजरीवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, त्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत काँग्रेसच्या काही नेत्यांची दिल्लीत एक बैठक झाली. 

काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत या नेत्यांनी त्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला पाठिंबा न देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते, असे नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विरोधी ऐक्याबाबत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी पक्ष नेतृत्वाने आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा संकेत दिला होता, असे सांगितले जात आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, दिल्लीतील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवरून केंद्र सरकार आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अधिकाऱ्यांशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी दिल्ली सरकारवर टाकली होती. यानंतर १९ मे रोजी केंद्र सरकारने याबाबत अध्यादेश जारी केला. यानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार उपराज्यपालांना असतील. यावर संसदेत कायदा केला जाणार आहे. अरविंद केजरीवाल हा कायदा संसदेत संमत केला जाऊ नये, यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे