शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अरविंद केजरीवालांना धक्का! काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 15:25 IST

Congress And AAP: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

Congress And AAP: केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनाही भेटले. या सर्वांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेसकडून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्राने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. राज्यसभेत या अध्यादेशाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांच्याकडून केले जात आहे. यासाठी अरविंद केजरीवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, त्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत काँग्रेसच्या काही नेत्यांची दिल्लीत एक बैठक झाली. 

काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत या नेत्यांनी त्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला पाठिंबा न देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते, असे नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विरोधी ऐक्याबाबत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी पक्ष नेतृत्वाने आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा संकेत दिला होता, असे सांगितले जात आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, दिल्लीतील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवरून केंद्र सरकार आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अधिकाऱ्यांशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी दिल्ली सरकारवर टाकली होती. यानंतर १९ मे रोजी केंद्र सरकारने याबाबत अध्यादेश जारी केला. यानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार उपराज्यपालांना असतील. यावर संसदेत कायदा केला जाणार आहे. अरविंद केजरीवाल हा कायदा संसदेत संमत केला जाऊ नये, यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे