शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 06:35 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार, कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर...

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा थेट आरोप केला. ते म्हणाले की, देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर अणुबॉम्बसारखा हल्ला आहे. २०२४ ची लोकसभा व त्यानंतरची विधानसभा निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूकच नव्हे, तर संविधानाच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे. देशभरात एक मोठा गुन्हा घडतोय. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहेत. हा संविधानावर हल्ला आहे. याला गुन्हा समजले पाहिजे, असा घणाघात राहुल यांनी केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार केले. कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघातील डेटा विश्लेषणाच्या आधारे आम्ही या फसवणुकीचे भक्कम पुरावे मिळविले आहेत. निवडणूक आयोग देशभरात असे आणखी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, असाही दावा त्यांनी केला. एक दिवस विरोधक सत्तेत येतील. जे निवडणूक अधिकारी हे करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. संविधानाचा पाया हादरवणाऱ्यांना माफी नाही, असा इशारा राहुल यांनी दिला. 

महाराष्ट्रात ४० लाख बनावट मतदारमहाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. ४० लाख मतदारांच्या नावांबाबत संभ्रम आहे. संध्याकाळी ५ नंतर मतदानात अचानक झालेली वाढदेखील आश्चर्यकारक आहे. हे मतदान का वाढले? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे. 

राज्य निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारामहाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राहुल यांना पत्र लिहून, मतदार यादीत अयोग्यरित्या समाविष्ट किंवा वगळले गेलेल्या नावांचे तपशील असलेले सहीयुक्त घोषणापत्र सादर करण्यास सांगितले, जेणेकरून शोध घेता येईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मसुदा आणि अंतिम मतदार यादीवर काँग्रेसने आक्षेप नोंदवलेला नाही.

राहुल यांचा दावा : या पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’पाच प्रकारच्या मतचोरीचे उदाहरण म्हणून बंगळुरू मध्य मतदारसंघातील महादेवपूर विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण राहुल गांधी यांनी सादर केले. बनावट मतदार    ११,९६५खोटे/अवैध पत्ते    ४०,००९एकाच पत्त्यावरअनेक मतदार     १०,४५२अवैध फोटो    ४,१३२फॉर्म ६चा गैरवापर    ३३,६९२एकूण ‘व्होट चोरी’    १,००,२५०

मला वाटते मतांची चोरी महाराष्ट्रात किंवा भारतातही झालेली नाही. काही चोरीला गेलेच असेल तर राहुल गांधींच्या डोक्याची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात. ते खोटे बोलतात व पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. मागच्या वेळी सांगितले महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. आता सांगितले एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवे सांगून सनसनाटी आरोप करण्याचा प्रयत्न करतात.  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

काय म्हणतो कर्नाटक आयोग? : राहुल यांना खरोखरच आपले दावे खरे असल्याचे सिद्ध करायचे असतील तर त्यांनी शपथपत्र सादर करून त्यांना खोट्या वाटणाऱ्या मतदारांची यादी द्यावी .

राहुल गांधींचे प्रश्नप्रस्थापित सरकारविरोधी लाटेचा भाजपवर परिणाम होत नाही, मात्र इतर पक्षांच्या सरकारांवर होतो याचे कारण काय?पूर्वी अद्यावत तंत्रज्ञान नव्हते तरी एका दिवसात मतदान आटोपायचे. आता एका दिवसात का होत नाही? अनेक टप्पे का चालतात?आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? यंत्राद्वारे वाचता येणार नाहीत अशा मतदार याद्या का पुरवल्या जातात? सीसीटीव्ही फुटेज का देत नाही?

दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवार, दि. ८ ऑगस्टला बंगळुरूत मोर्चाचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण