शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:15 IST

मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

इंफाळ: मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 प्रादेशिक लष्करी(टेरिटोरियल आर्मी) छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या अपघातात 30-40 जवान मातीत गाडले गेले.

7 जणांचा मृत्यूमीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 30-40 पेक्षा जास्त अजूनही मातीखाली असल्याची माहिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

सर्वसामान्यांनाही फटकाजखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरड कोसळल्याने इझाई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते. वृत्तानुसार, काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे. पण, खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. 

या भागात विनाशाचा धोकाजिल्हा प्रशासनाने जवळच्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचा आणि लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. मातीमुळे इजाई नदीचे पाणी एकाच ठिकाणी साचले आहे, यामुळे धरण सदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. आसाम, मणिपूरसह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये संततधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. आसाममध्ये 10 दिवसांत आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बाधित झाले आहेत. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनDeathमृत्यूRainपाऊस