शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले

By हेमंत बावकर | Updated: October 19, 2020 15:31 IST

india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आज मोठी कारवाई केली आहे. लडाखच्या पूर्वेकडील देमचोक सेक्टरमधून एका चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चिनी सैनिकाकडे महत्वाचे कागदपत्र सापडले आहेत. 

वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने चुकून भारतीय हद्दीत प्रवेशे केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय सैन्याकडून सुरु असलेल्या चिनी सैनिकाच्या चौकशीमध्ये तो एकटाच भारतीय हद्दीत कसा घुसला असे विचारले जात आहे. हेरगिरी करण्याच्या इराद्याने त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला का? की वाट चुकला याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य पुढील कारवाई करणार आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोरभारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. देमचोक, पेंगाँग झीलचा उत्तर आणि दक्षिणेकडचा किनारा डोकलाम या भागात तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादावेळी हिंसात्मक चकमक झाली होती. यामुळे दोन्ही बाजुच्या सैन्याचा मोठा फौजफाटा एलएसीवर तैनात आहे. 

दोन्हा देशांमध्ये सीमेवरून वाद असल्याने नेहमी अशा घटना घडत असतात. मात्र, ते चिनी नागरिक असतात. सैनिक नसतो. भारताने वेळोवेळी चिनी नागरिकांना पुन्हा चीनच्या ताब्यात दिले आहे. या तणाव काळात एक चिनी जोडपे रस्ता चुकले होते. भारतीय सैन्याने त्यांना पाहून आधी विचारपूस केली नंतर त्यांना अन्नपाणी देत चीनच्या सैन्याकडे सोपविले. या काळात भारतीय जवानांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली. 

प्रोटोकॉल काय सांगतोप्रोटोकॉलनुसार जर कोणी अजानतेपणी सीमापार करून येत असेल तर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. मात्र, चीनचा विश्वासघातकीपणा एवढा वाढलेला आहे की चीनने काहीतरी आगळीक करण्यासाठीदेखील सैनिकाला पाठविण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या पाच तरुणांचे अपहरण केले होते. भारताच्या आरोपांवरही चीन मूग गिळून गप्प होता. मात्र, नंतर काही दिवसांनी चीनने या तरुणांना सोडून दिले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन