शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले

By हेमंत बावकर | Updated: October 19, 2020 15:31 IST

india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने आज मोठी कारवाई केली आहे. लडाखच्या पूर्वेकडील देमचोक सेक्टरमधून एका चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चिनी सैनिकाकडे महत्वाचे कागदपत्र सापडले आहेत. 

वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याने चुकून भारतीय हद्दीत प्रवेशे केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा चीनच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय सैन्याकडून सुरु असलेल्या चिनी सैनिकाच्या चौकशीमध्ये तो एकटाच भारतीय हद्दीत कसा घुसला असे विचारले जात आहे. हेरगिरी करण्याच्या इराद्याने त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला का? की वाट चुकला याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य पुढील कारवाई करणार आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. 

दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोरभारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. देमचोक, पेंगाँग झीलचा उत्तर आणि दक्षिणेकडचा किनारा डोकलाम या भागात तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादावेळी हिंसात्मक चकमक झाली होती. यामुळे दोन्ही बाजुच्या सैन्याचा मोठा फौजफाटा एलएसीवर तैनात आहे. 

दोन्हा देशांमध्ये सीमेवरून वाद असल्याने नेहमी अशा घटना घडत असतात. मात्र, ते चिनी नागरिक असतात. सैनिक नसतो. भारताने वेळोवेळी चिनी नागरिकांना पुन्हा चीनच्या ताब्यात दिले आहे. या तणाव काळात एक चिनी जोडपे रस्ता चुकले होते. भारतीय सैन्याने त्यांना पाहून आधी विचारपूस केली नंतर त्यांना अन्नपाणी देत चीनच्या सैन्याकडे सोपविले. या काळात भारतीय जवानांनी त्यांची पुरेपूर काळजी घेतली. 

प्रोटोकॉल काय सांगतोप्रोटोकॉलनुसार जर कोणी अजानतेपणी सीमापार करून येत असेल तर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. मात्र, चीनचा विश्वासघातकीपणा एवढा वाढलेला आहे की चीनने काहीतरी आगळीक करण्यासाठीदेखील सैनिकाला पाठविण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या पाच तरुणांचे अपहरण केले होते. भारताच्या आरोपांवरही चीन मूग गिळून गप्प होता. मात्र, नंतर काही दिवसांनी चीनने या तरुणांना सोडून दिले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन