शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

'सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही मोठी चूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 7:00 PM

देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे

नवी दिल्ली - लोकशाहीत प्रशासन आणि सरकारवर टीका होत असते. ही टीका सहन करता आली पाहिजे. या टीका करणाऱ्यांवर आवाज दडपला जाणार असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जर टीकाकरांना सरकारी अधिकाऱ्यांकडून फोन येत असतील. त्यांना गप्प बसण्यासाठी दबाव टाकत असतील. सत्ताधारी पार्टीच्या ट्रोलरकडून लक्ष्य केलं जात असेल. तर त्याने टीका करणं कमी होतं असं रघुराम राजन यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रघुराम राजन यांनी हे भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारविरोधातील कटूसत्य समोर आलं नाही तर सरकार आनंदात असतं. आपण किती महान आहोत हे पाहण्यासाठी इतिहासात पाहिलं पाहिजे. मात्र त्या इतिहासाचे दाखले देऊन छाती बडवून घेणे अन् मोठेपणा सांगणे यातून असुरक्षिततेची भावना समोर येते असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. विचारांवर एका समाजाची मक्तेदारी असू शकत नाही. मतभेद आणि विचार दडपल्याने कोणतीही चुकीची धोरणे बरोबर ठरत नाही अशा शब्दात रघुराम राजन यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, देशात विविध विचारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशासमोर आज अनेक आव्हानं आहेत. समाजात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत जर अधिकारी अथवा सरकारला त्यांच्या चुका दाखवून दिल्या नाही तर सरकार आत्मकेंद्रीत होईल. तसेच इतर देशांची स्पर्धा करत असताना आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होईल हे चुकीचं असल्याचं मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजन