शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:00 IST

Poverty In India Fall: जागतिक बँकेचा एक अहवाल आला असून, यात मोदी सरकारच्या अनेक योजनांची दखल घेण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले आहे.

Extreme Poverty Down In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन ११ वर्षे झाली आहेत. गेल्या ११ वर्षांत अनेक स्तरांवर विविध प्रकारचे विक्रम सरकारने रचले आहेत. अयोध्येतील राम मंदिर ते ऑपरेशन सिंदूर हा पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा आलेख वाढत गेलेला पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने देशातील गरिबी, बेरोजगारी अशा अनेकविध मुद्द्यांवर बोट ठेवून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच भारतातील गरिबीबाबत एक अहवाल आला आहे. यातील आकडेवारीमुळे भारतातील गरिबी कमी झाली का, किती कमी झाली, याबाबत सविस्तर आकडेवारी मांडल्याचे सांगितले जात आहे. 

भारत वेगाने विकास करत असून, अलीकडेच जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. यातच आता जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गरिबीविरुद्धच्या लढाईत मोठा विजय मिळवला आहे. गेल्या ११ वर्षांत भारतातील अत्यंतिक गरिबांची संख्या २७.१ टक्क्यांवरून फक्त ५.३ टक्क्यांवर आली आहे, असे या अहवालात आकडेवारीसह सांगण्यात आले आहे.

भारतातील अत्यंतिक गरिबी कमी झाली

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये भारतातील अत्यंतिक गरिबी ५.३ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. गेल्या दशकात म्हणजेच २०११-१२ मध्ये देशात अत्यंत गरिबीत जगणाऱ्या नागरिकांचा दर २७.१ टक्क्यांवर होता. तो आता ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बँकेने त्यांच्या दारिद्र्यरेषेच्या मर्यादेत दररोज ३ अमेरिकन डॉलर्सपर्यंत सुधारणा केली आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबीचे प्रमाण किती घटले?

जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, ग्रामीण भागात अत्यंत दारिद्र्यरेषेचा आकडा १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर शहरी भागात १०.७ टक्क्यांवरून १.१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ग्रामीण-शहरी दारिद्र्यरेषा ७.७ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, असे या जागतिक बँकेने म्हटले आहे.

ही बाब मोदी सरकारसाठी एक मोठे यश

जागतिक बँकेच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०११-१२ मध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या भारतीयांची संख्या (प्रतिदिन ३ डॉलर या मानकानुसार) ३४ कोटी इतकी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ही संख्या ७.५ कोटींवर आली. याचाच अर्थ देशातील २६.५ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. ही बाब मोदी सरकारसाठी एक मोठे यश मानले जात आहे. 

दरम्यान, भारतातील गरिबांच्या संख्येवरील जागतिक बँकेच्या या अहवालात, मोदी सरकारच्या मोफत आणि अनुदानित अन्न हस्तांतरण योजनांनी देशातील गरिबी कमी करण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या मदतीने ग्रामीण-शहरी गरिबीतील दरी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या मते, गेल्या दशकात भारताने गरिबी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश मिळवले असून, या मोठ्या कामगिरीबद्दल मोदी सरकारचे कौतुक करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार