शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? कमलनाथ मुलासह दिल्लीला रवाना; भाजप प्रवेशाच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 14:19 IST

कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

Congress Kamal Nath ( Marathi News ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील मुलगा नकुलनाथ यांच्यासह भाजपचे कमळ हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतील, असे समजते.

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने ही निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढवली होती. पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्याने कमलनाथ यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. काँग्रेस नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जीतू पटवारी यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे कमलनाथ हे नाराज झाल्याची चर्चा होती. तसंच त्यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ हेदेखील भाजप प्रवेशास आग्रही असल्याची मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच पिता-पुत्र अचानक दिल्लीला रवाना झाल्याने याबाबतच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे.

काँग्रेसबद्दल काही दिवसांपूर्वी काय म्हणाले होते कमलनाथ?

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट लिहीत काँग्रेसच्या विचारधारेचा जयजयकार केला होता. "काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनावेळी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माण करणं हेच काँग्रेसचं एकमेव ध्येय आहे. आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीचा विरोध करणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंद आणि मजबूत लोकशाही बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत बलशाली भारत निर्माण करू," असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस