शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? कमलनाथ मुलासह दिल्लीला रवाना; भाजप प्रवेशाच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 14:19 IST

कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

Congress Kamal Nath ( Marathi News ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील मुलगा नकुलनाथ यांच्यासह भाजपचे कमळ हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतील, असे समजते.

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने ही निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढवली होती. पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्याने कमलनाथ यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. काँग्रेस नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जीतू पटवारी यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे कमलनाथ हे नाराज झाल्याची चर्चा होती. तसंच त्यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ हेदेखील भाजप प्रवेशास आग्रही असल्याची मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच पिता-पुत्र अचानक दिल्लीला रवाना झाल्याने याबाबतच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे.

काँग्रेसबद्दल काही दिवसांपूर्वी काय म्हणाले होते कमलनाथ?

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट लिहीत काँग्रेसच्या विचारधारेचा जयजयकार केला होता. "काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनावेळी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माण करणं हेच काँग्रेसचं एकमेव ध्येय आहे. आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीचा विरोध करणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंद आणि मजबूत लोकशाही बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत बलशाली भारत निर्माण करू," असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस