शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:32 IST

Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी माहिती देण्यात आली.

Bihar Assembly Election 2025 Politics:बिहार विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिन्यांचा अवधी आहे. भाजपाने पूर्वीपासूनच बिहार निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अन्य पक्षांसोबत भाजपा आगामी बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. परंतु, असे असले तरी जास्तीत जास्त जागा जिंकून मित्रपक्षांना शह देण्याची रणनीती भाजपा बिहारमध्येही वापरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एका मित्रपक्षाने घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीसोबत जाण्याचा विचारही बोलून दाखवला आहे. 

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (रालोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी मोठी घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना पशुपति पारस यांनी सांगितले की, सन २०१४ पासून आतापर्यंत एनडीएमध्ये होतो. एनडीएचा एक निष्ठावंत घटकपक्ष आणि सहकारी म्हणून काम केले. जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा एनडीएने आमच्या पक्षावर अन्याय केला, कारण तो दलितांचा पक्ष आहे. तरीही राष्ट्रीय हितासाठी आमच्या पक्षाने निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ६ ते ८ महिन्यांनंतर जेव्हा बिहारमध्ये एनडीएची बैठक होते, तेव्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष बिहारमध्ये '५ पांडव' असल्याचे विधान करतात. त्यात ते आमच्या पक्षाचे नाव कुठेही घेत नाहीत. आता शेवटी एनडीएतून बाहेर पडणे आम्हाला भाग आहे. आम्हाला भाग पाडले गेले, अशी खंत पशुपति पारस यांनी बोलून दाखवली.

आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत 

आम्ही लोकांमध्ये जात आहोत आणि सदस्यता मोहीम सुरू केली आहे. आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत. इंडिया आघाडीसह महागठबंधनने योग्य वेळी, आम्हाला योग्य सन्मान दिला तर आम्ही भविष्यात त्यांच्या सोबत जाण्याबाबत नक्कीच विचार करू, असे स्पष्ट संकेतही पशुपति पारस यांनी दिले. तसेच पक्षाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य सन्मान देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित केलेले नाही. मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असेही पारस यांनी नमूद केले.

दरम्यान, पशुपति पारस यांच्या या निर्णयानंतर भाजपासह एनडीए आणि चिराग पासवान यांच्यासमोरील आव्हान वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी, वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला विरोध करताना पशुपति पारस यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पारस म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींना ४०० जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी संविधान बदलले असते. आता ते बहुमतात नसल्याने, देशात अशांतता पसरवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा आणण्यात आला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच वक्फ कायद्यातील बदलांना विरोध करत आहोत, असे पारस यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी