शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:32 IST

Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी माहिती देण्यात आली.

Bihar Assembly Election 2025 Politics:बिहार विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिन्यांचा अवधी आहे. भाजपाने पूर्वीपासूनच बिहार निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अन्य पक्षांसोबत भाजपा आगामी बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. परंतु, असे असले तरी जास्तीत जास्त जागा जिंकून मित्रपक्षांना शह देण्याची रणनीती भाजपा बिहारमध्येही वापरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एका मित्रपक्षाने घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीसोबत जाण्याचा विचारही बोलून दाखवला आहे. 

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (रालोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी मोठी घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना पशुपति पारस यांनी सांगितले की, सन २०१४ पासून आतापर्यंत एनडीएमध्ये होतो. एनडीएचा एक निष्ठावंत घटकपक्ष आणि सहकारी म्हणून काम केले. जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा एनडीएने आमच्या पक्षावर अन्याय केला, कारण तो दलितांचा पक्ष आहे. तरीही राष्ट्रीय हितासाठी आमच्या पक्षाने निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ६ ते ८ महिन्यांनंतर जेव्हा बिहारमध्ये एनडीएची बैठक होते, तेव्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष बिहारमध्ये '५ पांडव' असल्याचे विधान करतात. त्यात ते आमच्या पक्षाचे नाव कुठेही घेत नाहीत. आता शेवटी एनडीएतून बाहेर पडणे आम्हाला भाग आहे. आम्हाला भाग पाडले गेले, अशी खंत पशुपति पारस यांनी बोलून दाखवली.

आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत 

आम्ही लोकांमध्ये जात आहोत आणि सदस्यता मोहीम सुरू केली आहे. आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत. इंडिया आघाडीसह महागठबंधनने योग्य वेळी, आम्हाला योग्य सन्मान दिला तर आम्ही भविष्यात त्यांच्या सोबत जाण्याबाबत नक्कीच विचार करू, असे स्पष्ट संकेतही पशुपति पारस यांनी दिले. तसेच पक्षाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य सन्मान देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित केलेले नाही. मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असेही पारस यांनी नमूद केले.

दरम्यान, पशुपति पारस यांच्या या निर्णयानंतर भाजपासह एनडीए आणि चिराग पासवान यांच्यासमोरील आव्हान वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी, वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला विरोध करताना पशुपति पारस यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पारस म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींना ४०० जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी संविधान बदलले असते. आता ते बहुमतात नसल्याने, देशात अशांतता पसरवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा आणण्यात आला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच वक्फ कायद्यातील बदलांना विरोध करत आहोत, असे पारस यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी