शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Uma Bharti: 'मोदींचं भाषण ऐकून अवाक् झाले, हे तर भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश'; कृषी कायद्यांवर उमा भारतींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 18:13 IST

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा धक्काच बसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना समजून न घेणं हे भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश असल्याचं उमा भारती म्हणाल्या आहेत. 

कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते मोदींवर जोरदार टीका करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र मोदींनी योग्य विचार करुन पाऊल टाकल्याचं म्हणत आहेत. 

"मी गेल्या चार दिवसांपासून वाराणसीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा मी अवाक् झाले होते. त्यामुळेच आज तीन दिवसांनंतर मी माझी प्रतिक्रिया देत आहे. कृषी कायदे मागे घेताना मोदींनी जी प्रतिक्रिया दिल्या त्यानं मी खूप व्यथित झाले आहे. कृषी कायद्यांचं महत्त्व जर मोदी शेतकऱ्यांना समजावू शकले नसले तर हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं अपयश आहे. आम्ही शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क का करू शकलो नाही", असं उमा भारती म्हणाल्या. 

पंतप्रधान मोदी हे अतिशय विचारपूर्वक आणि समस्येच्या मूळाशी जाऊन निर्णय घेणारे नेते आहेत. जो समस्येचं मूळ समजून घेतो तोच व्यक्ती समस्येचं समाधान शोधून काढू शकतो. देशाची जनता आणि पंतप्रधान मोदींचा एकमेकांशी समन्वय, जागतिक राजकारण हे सारं ऐतिहासिक आहे. कृषी कायद्यांबाबत विरोधकांच्या अपप्रचाराचा सामना आम्ही करू शकलो नाही. त्यामुळेच मी पंतप्रधानांच्या त्या भाषणानंतर मी खूप व्यथित झाले होते, असं उमा भारती म्हणाल्या. 

खरंतर कृषी कायदे मागे घेऊनही पंतप्रधान मोदींनी आपलं महानता दाखवून दिली आहे. आपल्या देशात असा अनोखा नेता सैदव यशस्वी राहिला पाहिजे अशी बाबा विश्वनाथ आणि माँ गंगे चरणी प्रार्थना करते, असंही उमा भारती शेवटी म्हणाल्या.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपा