शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

Uma Bharti: 'मोदींचं भाषण ऐकून अवाक् झाले, हे तर भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश'; कृषी कायद्यांवर उमा भारतींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 18:13 IST

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा धक्काच बसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना समजून न घेणं हे भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश असल्याचं उमा भारती म्हणाल्या आहेत. 

कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते मोदींवर जोरदार टीका करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र मोदींनी योग्य विचार करुन पाऊल टाकल्याचं म्हणत आहेत. 

"मी गेल्या चार दिवसांपासून वाराणसीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा मी अवाक् झाले होते. त्यामुळेच आज तीन दिवसांनंतर मी माझी प्रतिक्रिया देत आहे. कृषी कायदे मागे घेताना मोदींनी जी प्रतिक्रिया दिल्या त्यानं मी खूप व्यथित झाले आहे. कृषी कायद्यांचं महत्त्व जर मोदी शेतकऱ्यांना समजावू शकले नसले तर हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं अपयश आहे. आम्ही शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क का करू शकलो नाही", असं उमा भारती म्हणाल्या. 

पंतप्रधान मोदी हे अतिशय विचारपूर्वक आणि समस्येच्या मूळाशी जाऊन निर्णय घेणारे नेते आहेत. जो समस्येचं मूळ समजून घेतो तोच व्यक्ती समस्येचं समाधान शोधून काढू शकतो. देशाची जनता आणि पंतप्रधान मोदींचा एकमेकांशी समन्वय, जागतिक राजकारण हे सारं ऐतिहासिक आहे. कृषी कायद्यांबाबत विरोधकांच्या अपप्रचाराचा सामना आम्ही करू शकलो नाही. त्यामुळेच मी पंतप्रधानांच्या त्या भाषणानंतर मी खूप व्यथित झाले होते, असं उमा भारती म्हणाल्या. 

खरंतर कृषी कायदे मागे घेऊनही पंतप्रधान मोदींनी आपलं महानता दाखवून दिली आहे. आपल्या देशात असा अनोखा नेता सैदव यशस्वी राहिला पाहिजे अशी बाबा विश्वनाथ आणि माँ गंगे चरणी प्रार्थना करते, असंही उमा भारती शेवटी म्हणाल्या.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपा