शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Uma Bharti: 'मोदींचं भाषण ऐकून अवाक् झाले, हे तर भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश'; कृषी कायद्यांवर उमा भारतींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 18:13 IST

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Uma Bharti on Farm Laws Repeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा धक्काच बसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना समजून न घेणं हे भाजपा कार्यकर्त्यांचं मोठं अपयश असल्याचं उमा भारती म्हणाल्या आहेत. 

कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते मोदींवर जोरदार टीका करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र मोदींनी योग्य विचार करुन पाऊल टाकल्याचं म्हणत आहेत. 

"मी गेल्या चार दिवसांपासून वाराणसीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा मी अवाक् झाले होते. त्यामुळेच आज तीन दिवसांनंतर मी माझी प्रतिक्रिया देत आहे. कृषी कायदे मागे घेताना मोदींनी जी प्रतिक्रिया दिल्या त्यानं मी खूप व्यथित झाले आहे. कृषी कायद्यांचं महत्त्व जर मोदी शेतकऱ्यांना समजावू शकले नसले तर हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं अपयश आहे. आम्ही शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क का करू शकलो नाही", असं उमा भारती म्हणाल्या. 

पंतप्रधान मोदी हे अतिशय विचारपूर्वक आणि समस्येच्या मूळाशी जाऊन निर्णय घेणारे नेते आहेत. जो समस्येचं मूळ समजून घेतो तोच व्यक्ती समस्येचं समाधान शोधून काढू शकतो. देशाची जनता आणि पंतप्रधान मोदींचा एकमेकांशी समन्वय, जागतिक राजकारण हे सारं ऐतिहासिक आहे. कृषी कायद्यांबाबत विरोधकांच्या अपप्रचाराचा सामना आम्ही करू शकलो नाही. त्यामुळेच मी पंतप्रधानांच्या त्या भाषणानंतर मी खूप व्यथित झाले होते, असं उमा भारती म्हणाल्या. 

खरंतर कृषी कायदे मागे घेऊनही पंतप्रधान मोदींनी आपलं महानता दाखवून दिली आहे. आपल्या देशात असा अनोखा नेता सैदव यशस्वी राहिला पाहिजे अशी बाबा विश्वनाथ आणि माँ गंगे चरणी प्रार्थना करते, असंही उमा भारती शेवटी म्हणाल्या.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपा