शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:24 IST

भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली.

नवी दिल्ली- भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही कौतुक केले. जेव्हा तुम्ही राजकीय भूमिका घेता तेव्हा चर्चेला वेगळे वळण लागते त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका कौतुकास्पद आहे असे नायडू यांनी सांगितले. काँग्रेसच्या सदस्या रजनी पाटील आणि समाजवादी पक्षाचे नेते नरेश आग्रवाल यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करुन अहवाल मागवावा असे मत मांडले. रजनी पाटील यांनी ज्या नेत्यांची नावे घेतली त्याबाबत कारवाई सुरु आहे, त्यामुळे त्यावर आता फार बोलणे आवश्यक नाही. जे झालं ते झालं आता लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न करुया असे शरद पवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

शरद पवार यांच्यासह नरेश अग्रवाल, डी. राजा, कनिमोझी, संजय राऊत, अमर साबळे, संभाजी राजे छत्रपती, व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले, "ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका सोडून निषेध केला पाहिजे. दरवर्षी दलितांवर हल्ले होण्याच्या 45 हजार घटना घडतात. सर्व सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या सरकारला यासाठी दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे."

रामदास आठवले यांच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त सदस्य संभाजी राजे छत्रपती यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. "आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहोत, कृपया मला मराठीतूनही निवेदन करु द्या अशी विनंती करुन त्यांनी आपले मत मांडले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्ना ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी अठरापगड जाती आणि बहुजन समाजाला एकत्रित भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी" अशा आशयाचे निवेदन त्यांनी केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत, राज्य सरकारने अत्यंत संयमाने भूमिका घेतल्याचे सभागृहाला सांगितले. राज्यातील परिस्थिती आणखी बिघडली असती मात्र राज्य सरकारने जे केले ते ठिक केले असे राऊत यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव लढाईच्या मुद्द्यावर काही लोक वारंवार याबाबत हिंदुत्त्ववादी संघटनांकडे बोट दाखवत आहेत पण पेशव्यांचा आरएसएस आणि हिंदू एकता संघटनेशी नव्हता. येथे जे झाले त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती त्या अदृश्य हातांना शोधण्याचं काम केलं पाहिजे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावRajya Sabhaराज्यसभाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती