शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

Bhima Koregaon: देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' दिलासा; 'त्या' पाच जणांच्या अटकेमागे राजकारण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 12:25 IST

पाचही आरोपींची नजरकैदेत चार आठवड्यांनी वाढवली

नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील पाच आरोपींची नजरकैद सर्वोच्च न्यायालयानं आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना देशभरातून अटक केली होती. ही कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप केला जात होता. मात्र ही कारवाई राजकीय हेतूनं करण्यात आलेली नाही, असं न्यायालयानं म्हटलं. पोलिसांनी कारवाईदरम्यान बळाचा गैरवापर केलेला नसल्याचंही न्यायालयानं निकालात म्हटलं. पुणे पोलिसांनी त्यांचा तपास पुढे चालू ठेवावा असे आदेश न्यायालयानं यावेळी दिले. पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असं निकाल सुनावताना न्यायालयानं म्हटलं. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना तुरुंगात न ठेवता, नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना धक्का दिला होता. या अटकेविरोधात इतिहासकार रोमिला थापर आणि अन्य चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयानं निकाल दिला आणि पाचही कार्यकर्त्यांची नजरकैद चार आठवड्यानं वाढवली. या काळात आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं. 

पाच कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात रोमिला थापर यांच्यासह चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. मात्र न्यायालयानं अटकेच्या कारवाईत हस्तक्षेप केला. याशिवाय अटक करण्यात आलेले आरोपी त्यांची चौकशी कोणी करायची ते ठरवू शकत नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. हैदराबादमधून सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव, फरिदाबादमधून सुधा भारद्वाज, दिल्लीमधून गौतम नवलखा यांना अटक केली होती. तर ठाण्यातून अरुण फरेरा आणि गोव्यातून वर्नान गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत त्यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली.  याआधीच्या सुनावणीत न्यायालयानं पाचही कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. कार्यकर्त्यांना अटक न करता, नजरकैदेत ठेवलं जावं, अशा सूचना न्यायालयानं पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पाचही कार्यकर्ते नजरकैदेत आहेत. आता ही नजरकैद चार आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार