शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव : ‘एनआयए’वरील प्रतिकूल शेरे सुप्रीम कोर्टाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 03:52 IST

गौतम नवलखा यांना हजर करण्याचे वॉरंट मुंबईतील न्यायालयाने काढल्यानंतरही नवलखा यांनी अंतरिम जामिनासाठी केलेल्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी घेणे चूक होते, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला.

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंधित खटल्यातील आरोपी व मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना हजर करण्याचे वॉरंट मुंबईतील न्यायालयाने काढल्यानंतरही नवलखा यांनी अंतरिम जामिनासाठी केलेल्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी घेणे चूक होते, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला. एवढेच नव्हे, तर त्या आदेशात राष्ट्रीय तपासी यंत्रणेच्या (एनआयए) कामावर ताशेरे ओढणारे उच्च न्यायालयाने नोंदविलेले प्रतिकूल शेरेही काढून टाकले गेले. ‘एनआयए’ने यासाठी केलेली याचिका मंजूर करून न्या. अरुण मिश्रा व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.नवलखा यांना दिल्लीत अटक केल्यानंतर ‘एनआयए’ने त्यांना मुंबईला नेऊन रिमांड घेण्यासाठी मुंबईतील न्यायालयाकडून २४ मे रोजी वॉरंट घेतले. मात्र, देशात त्यावेळी ‘लॉकडाऊन’ सुरू असल्याने त्यांना प्रत्यक्ष मुंबईला नेणे केव्हा शक्य होईल, हे नक्की नव्हते. दरम्यान, नवलखा यांनी अंतरिम जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी होऊन निकाल होण्यापूर्वीच नवलखा यांना दिल्लीहून मुंबईला आणले गेले.या पार्श्वभूमीवर नवलखा यांच्या अर्जावर आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अनुप भांभानी यांनी ‘एनआयए’वर ताशेरे मारताना म्हटले की, आरोपीला मुंबईला नेण्याची तपासी यंत्रणेला अनाठायी घाई झाल्याचे दिसते. या न्यायालयापुढील प्रकरण निरर्थक व्हावे यासाठीच ही घाई केली जात आहे. एवढेच नव्हे तर नवलखा यांना का व कशा पद्धतीने मुंबईला नेण्यात आले, याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्रही करण्याचा आदेश त्यांनी ‘एनआयए’ला दिला होता.‘एनआयए’च्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व नवलखा यांच्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, नवलखा यांच्या हजेरीचे वॉरंट व रिमांड आदेश मुंबईच्या न्यायालयाने दिल्यानंतर ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारित गेले होते. त्यानंतरही दिल्ली उच्च न्यायालयाने नवलखा यांचा अंतरिम जामीन अर्ज ऐकणे सर्वस्वी चुकीचे होते. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना मुंबईच्याच न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात आला होता. त्यामुळे नवलखा यांना अनावश्यक घाई करून दिल्लीहून मुंबईला नेण्यामागे अन्य काही हेतू असम्याचा प्रश्नच नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.मेहता यांनी न्यायालयात काय सांगितलेमेहता यांनी न्यायालयास सांगितले की, नवलखा जेव्हा ‘एनआयए’पुढे हजर झाले तेव्हा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ लागू होते. मात्र, मुंबईतील न्यायालयाने त्यांच्या हजेरीचे वॉरंट काढले तेव्हा त्या शहरातील व्यवहार अंशत: सुरू झाले होते.दरम्यानच्या काळात घडलेल्या घटनांची दिल्ली उच्च न्यायालयास वेळोवेळी माहिती दिली गेली होती. नवलखा यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मुंबईच्या न्यायालयापुढे हजर केल्यानंतर व त्या न्यायालयाने त्यांच्या रिमांडचा आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयास त्या आरोपीच्या जामीन अर्जावर विचार करण्याचा अधिकारच उरला नव्हता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार